शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गंभीर जखमी काळविटाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

धाडनजीक वनपरिक्षेत्र असल्याने आणि वनविभागाच्या अगदी जवळच शेती शिवार असल्याने हरीण, काळवीट, तडस, कोल्हे, रानरोही, माकड, रानडुक्कर यांसारखे वन्यजीव ...

धाडनजीक वनपरिक्षेत्र असल्याने आणि वनविभागाच्या अगदी जवळच शेती शिवार असल्याने हरीण, काळवीट, तडस, कोल्हे, रानरोही, माकड, रानडुक्कर यांसारखे वन्यजीव आहाराच्या शोधार्थ जंगल सोडून मानवीवस्तीत प्रवेश करत आहेत. मात्र मुक्त संचाराने वन्यप्राण्यांना अपघात घडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोन नर काळविटांच्या जोरदार झुंजीत एक नर काळवीट गंभीर जखमी झाले हाेते. त्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. पाऊस असल्याने भटक्या कुत्र्यांच्या तावडीत ते काळवीट सापडले. त्याच्यावर कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवला. ही बाब शेतकरी भगवान तायडे, अमोल तायडे, विनोद भोंडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी काळविटाची सुटका केली. याविषयी प्राणिमित्र नीलेश गुजर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी जखमी काळविटाला उपचार देऊन वनविभागाच्या ताब्यात दिले.

वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार

धाड परिसरात वन्यप्राण्यांच्या मुक्त वावराने शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पिकांची अतोनात नासाडी करीत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे. धाड भागातील जंगलात हरीण, काळविटांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे.

वन्यजीव सातत्याने शेतशिवारात मुक्तसंचार करत आहेत आणि आहार शोधताना त्यांना अपघात होतात. या प्राण्यांवर मोकाट कुत्रे हल्ला करून जखमी करतात. वन्यप्राण्यांना घात केला म्हणून काही गुन्हा वैगेरे होईल या भीतीपोटी शेतकरी जखमी वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी समोर येत नाहीत. यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात.

नीलेश गुजर, प्राणी आणि सर्पमित्र, धाड