शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

एकाच बागेची चार वेळा चढ्या भावात विक्री! व्यापारी मालामाल, शेतकऱ्यांना मिळतो अल्प भाव

By विवेक चांदुरकर | Updated: August 24, 2023 15:40 IST

एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.

 खामगाव : जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. मात्र, फळप्रक्रिया उद्योग नसून विक्रीसाठी शेतकऱ्यांना संपूर्णत: व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. व्यापारीच संत्र्याचे दर ठरवत असून, शेतकऱ्यांना नाइलाजाने विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.

जिल्ह्यात संत्र्याचे आंबीया व मृग असे दोन बहार घेण्यात येतात. दोन्ही वेळी व्यापारी शेतातील संत्रा खरेदी करतात. जिल्ह्यात मार्केट नसल्याने व्यापारी ठरवतील तेच दर शेतकऱ्यांना द्यावे लागतात. अनेकदा व्यापारी अल्प भावात संत्राची बाग खरेदी करतात. शेतकऱ्यांना एक तृतीयांश रक्कम देतात. त्यानंतर एक महिन्याने जास्त भावात व्यापारी दुसऱ्या शेतकऱ्याला विकतात. अशाप्रकारे एकाच बागेची तीन ते चार वेळा जास्त भावात विक्री करण्यात येते. यामध्ये व्यापारी कोणतेही कष्ट न करता लाखो रूपये कमावतात. शेतकऱ्यांना मात्र वर्षभर मेहनत घेवून भरमसाठ खर्च करून अल्प भाव मिळतो. मृग बहारातील संत्र्याला ७०० ते ८०० रूपये कॅरेटनुसार भाव मिळतो. तर आंबीया बहारातील संत्र्याला ४०० ते ५०० रूपये कॅरेट भाव मिळतो. व्यापारी बाजारानुसार संत्रा फळाच्या दर्जानुसार भाव ठरवतात. मात्र, संत्र्याचा दर्जा व्यापारीच ठरवतात. अनेकदा शेतकऱ्यांना बाजारापेक्षा कमी दरात विक्री करावी लागते. ज्या शेतकऱ्यांकडे कमी फळबागा आहेत, त्यांना जास्त नुकसान सहन करावे लागते.

१० हजार १२५ हेक्टरवर फळबागाजिल्ह्यात १० हजार १२५ हेक्टरवर फळबागा आहेत. यापैकी ६८८१.४० हेक्टरवर फळधारणा क्षेत्र आहे तर ३२४४.११ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड केली आहे. यापैकी ३२५९.६० टक्के क्षेत्रावर फळधारणा झालेले क्षेत्र असून, १३२३.२६ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात एकूण फळबागांपैकी ४५ टक्के क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड करण्यात आली आहे. फळबागांमध्ये संत्रा पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.    संग्रामपूर तालुक्यात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणचे मार्केट खूप मोठे आहे. मृग बहाराच्या वेळी अनेक व्यापारी येवून संत्रा खरेदी करतात. मात्र व्यापारी ठरवतात तेच दर द्यावे लागतात. शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने अल्प भावात विक्री करतात. व्यापारी मात्र लाखो रूपये कमावतात. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सूविधा द्यायला हव्या.- नारायण इंगळे, सचिव, संत्रा उत्पादक शेतकरी संघटना

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार