शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बागेची चार वेळा चढ्या भावात विक्री! व्यापारी मालामाल, शेतकऱ्यांना मिळतो अल्प भाव

By विवेक चांदुरकर | Updated: August 24, 2023 15:40 IST

एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.

 खामगाव : जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. मात्र, फळप्रक्रिया उद्योग नसून विक्रीसाठी शेतकऱ्यांना संपूर्णत: व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. व्यापारीच संत्र्याचे दर ठरवत असून, शेतकऱ्यांना नाइलाजाने विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.

जिल्ह्यात संत्र्याचे आंबीया व मृग असे दोन बहार घेण्यात येतात. दोन्ही वेळी व्यापारी शेतातील संत्रा खरेदी करतात. जिल्ह्यात मार्केट नसल्याने व्यापारी ठरवतील तेच दर शेतकऱ्यांना द्यावे लागतात. अनेकदा व्यापारी अल्प भावात संत्राची बाग खरेदी करतात. शेतकऱ्यांना एक तृतीयांश रक्कम देतात. त्यानंतर एक महिन्याने जास्त भावात व्यापारी दुसऱ्या शेतकऱ्याला विकतात. अशाप्रकारे एकाच बागेची तीन ते चार वेळा जास्त भावात विक्री करण्यात येते. यामध्ये व्यापारी कोणतेही कष्ट न करता लाखो रूपये कमावतात. शेतकऱ्यांना मात्र वर्षभर मेहनत घेवून भरमसाठ खर्च करून अल्प भाव मिळतो. मृग बहारातील संत्र्याला ७०० ते ८०० रूपये कॅरेटनुसार भाव मिळतो. तर आंबीया बहारातील संत्र्याला ४०० ते ५०० रूपये कॅरेट भाव मिळतो. व्यापारी बाजारानुसार संत्रा फळाच्या दर्जानुसार भाव ठरवतात. मात्र, संत्र्याचा दर्जा व्यापारीच ठरवतात. अनेकदा शेतकऱ्यांना बाजारापेक्षा कमी दरात विक्री करावी लागते. ज्या शेतकऱ्यांकडे कमी फळबागा आहेत, त्यांना जास्त नुकसान सहन करावे लागते.

१० हजार १२५ हेक्टरवर फळबागाजिल्ह्यात १० हजार १२५ हेक्टरवर फळबागा आहेत. यापैकी ६८८१.४० हेक्टरवर फळधारणा क्षेत्र आहे तर ३२४४.११ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड केली आहे. यापैकी ३२५९.६० टक्के क्षेत्रावर फळधारणा झालेले क्षेत्र असून, १३२३.२६ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात एकूण फळबागांपैकी ४५ टक्के क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड करण्यात आली आहे. फळबागांमध्ये संत्रा पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.    संग्रामपूर तालुक्यात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणचे मार्केट खूप मोठे आहे. मृग बहाराच्या वेळी अनेक व्यापारी येवून संत्रा खरेदी करतात. मात्र व्यापारी ठरवतात तेच दर द्यावे लागतात. शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने अल्प भावात विक्री करतात. व्यापारी मात्र लाखो रूपये कमावतात. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सूविधा द्यायला हव्या.- नारायण इंगळे, सचिव, संत्रा उत्पादक शेतकरी संघटना

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार