शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बागेची चार वेळा चढ्या भावात विक्री! व्यापारी मालामाल, शेतकऱ्यांना मिळतो अल्प भाव

By विवेक चांदुरकर | Updated: August 24, 2023 15:40 IST

एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.

 खामगाव : जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. मात्र, फळप्रक्रिया उद्योग नसून विक्रीसाठी शेतकऱ्यांना संपूर्णत: व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. व्यापारीच संत्र्याचे दर ठरवत असून, शेतकऱ्यांना नाइलाजाने विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.

जिल्ह्यात संत्र्याचे आंबीया व मृग असे दोन बहार घेण्यात येतात. दोन्ही वेळी व्यापारी शेतातील संत्रा खरेदी करतात. जिल्ह्यात मार्केट नसल्याने व्यापारी ठरवतील तेच दर शेतकऱ्यांना द्यावे लागतात. अनेकदा व्यापारी अल्प भावात संत्राची बाग खरेदी करतात. शेतकऱ्यांना एक तृतीयांश रक्कम देतात. त्यानंतर एक महिन्याने जास्त भावात व्यापारी दुसऱ्या शेतकऱ्याला विकतात. अशाप्रकारे एकाच बागेची तीन ते चार वेळा जास्त भावात विक्री करण्यात येते. यामध्ये व्यापारी कोणतेही कष्ट न करता लाखो रूपये कमावतात. शेतकऱ्यांना मात्र वर्षभर मेहनत घेवून भरमसाठ खर्च करून अल्प भाव मिळतो. मृग बहारातील संत्र्याला ७०० ते ८०० रूपये कॅरेटनुसार भाव मिळतो. तर आंबीया बहारातील संत्र्याला ४०० ते ५०० रूपये कॅरेट भाव मिळतो. व्यापारी बाजारानुसार संत्रा फळाच्या दर्जानुसार भाव ठरवतात. मात्र, संत्र्याचा दर्जा व्यापारीच ठरवतात. अनेकदा शेतकऱ्यांना बाजारापेक्षा कमी दरात विक्री करावी लागते. ज्या शेतकऱ्यांकडे कमी फळबागा आहेत, त्यांना जास्त नुकसान सहन करावे लागते.

१० हजार १२५ हेक्टरवर फळबागाजिल्ह्यात १० हजार १२५ हेक्टरवर फळबागा आहेत. यापैकी ६८८१.४० हेक्टरवर फळधारणा क्षेत्र आहे तर ३२४४.११ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड केली आहे. यापैकी ३२५९.६० टक्के क्षेत्रावर फळधारणा झालेले क्षेत्र असून, १३२३.२६ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात एकूण फळबागांपैकी ४५ टक्के क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड करण्यात आली आहे. फळबागांमध्ये संत्रा पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.    संग्रामपूर तालुक्यात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणचे मार्केट खूप मोठे आहे. मृग बहाराच्या वेळी अनेक व्यापारी येवून संत्रा खरेदी करतात. मात्र व्यापारी ठरवतात तेच दर द्यावे लागतात. शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने अल्प भावात विक्री करतात. व्यापारी मात्र लाखो रूपये कमावतात. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सूविधा द्यायला हव्या.- नारायण इंगळे, सचिव, संत्रा उत्पादक शेतकरी संघटना

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार