शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नाफेड खरेदी केंद्रावर आत्मक्लेश आंदोलन

By admin | Updated: March 3, 2017 00:24 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी : बारदान्याअभावी रोखलेली खरेदी पूर्ववत करा!

चिखली, दि.२ - गत आठ दिवसांपासून येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पोते (बारदाना) नसल्याचे कारण समोर करून तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक व छळ होत असल्याने येथील खरेदी केंद्रावर तातडीने आवश्यक बारदाना उपलब्ध करून देत खरेदी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत २ मार्च रोजी खरेदी केंद्रावर शेतमालासह उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसमवेत भर उन्हात तब्बल पाच तास ठिय्या देऊन आत्मक्लेश आंदोलन छेडले होते. यंदा निसर्गाच्या कृपेने शेतकऱ्यांना तुरीचे बऱ्यापैकी उत्पन्न हाती आले आहे. मात्र, बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल ५ हजार ५० रूपये भावानुसार नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून चिखली येथील नाफेड केंद्रावर तुरीच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर व इतर वाहनांद्वारे शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत, तर २ मार्च रोजी सुमारे २५००० हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र, या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याचे कारण समोर करून खरेदी मोजमाप बंद आहे. यामुळे शेतकरी वर्गाला आठ ते दहा दिवसांपासून आपल्या तुरीची रखवाली करावी लागत आहे, वारंवार बारदाना पोत्याची मागणी करूनही पोते मिळत नसल्यामुळे नाफेडला पोते उपलब्ध करून खरेदी पूर्वत करण्यात यावी, या मागणीसाठी २ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्यावतीने पाच तास उन्हामध्ये बसून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी व सचिव अजय मिरकड यांनी आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन उचित कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले. मात्र ३ मार्च रोजी खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, अनिल चव्हाण, भरत जोगदंडे, राम अंभोरे, विजय सुरूशे, बाळू कुटे, सुधाकर सपकाळ व शेतकऱ्यांनी यावेळी दिला.