शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कृषी विभागाने दिलेले महाबीजचे बियाणे निकृृष्ट

By admin | Updated: July 5, 2017 00:24 IST

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क

उद्धव फंगाळ /मेहकर

कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेले महाबीज सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने जवळपास १३० हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारामधून जादा दराने सोयाबीनचे बियाणे घेऊन दुबार पेरणी करावी लागली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे दिवसेंदिवस पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. काही पिके थोड्याफार प्रमाणात येतात; मात्र बाजारात भाव नसल्याने कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, तर या खरीप हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केलेली आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत मेहकर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी ७०० सोयाबीन बियाण्यांच्या बॅग कृषी विभागाकडे आल्या होत्या. या बॅग महाबीज कंपनीच्या होत्या. यामध्ये ग्रामीण भागातील काही गावातील शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांनाच या सोयाबीनचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये ७०० पैकी ३२८ शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून मिळालेल्या सोयाबीन बियाण्याची पेरणीसुद्धा केली होती; मात्र जवळपास १३० हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांना दिलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे जवळपास ३२८ शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून दुसरे बियाणे जादा पैसे देऊन खरेदी करुन दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- रहाटे सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मेहकर तालुक्यावर सतत निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे, शासनाकडूनही वेळेवर मदत न मिळणे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेले महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात महाबीज कंपनीवर कारवाई करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे यांनी केली आहे.उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेतून आलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. दरम्यान, अनेक ठिकाणचे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्याने शेतात जाऊन पाहणी केली. पंचनामा करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. -विजय सरोदेप्रभारी तालुका कृषी अधिकारी मेहकर.