शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने दिलेले महाबीजचे बियाणे निकृृष्ट

By admin | Updated: July 5, 2017 00:24 IST

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क

उद्धव फंगाळ /मेहकर

कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेले महाबीज सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने जवळपास १३० हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारामधून जादा दराने सोयाबीनचे बियाणे घेऊन दुबार पेरणी करावी लागली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे दिवसेंदिवस पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. काही पिके थोड्याफार प्रमाणात येतात; मात्र बाजारात भाव नसल्याने कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, तर या खरीप हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केलेली आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत मेहकर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी ७०० सोयाबीन बियाण्यांच्या बॅग कृषी विभागाकडे आल्या होत्या. या बॅग महाबीज कंपनीच्या होत्या. यामध्ये ग्रामीण भागातील काही गावातील शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांनाच या सोयाबीनचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये ७०० पैकी ३२८ शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून मिळालेल्या सोयाबीन बियाण्याची पेरणीसुद्धा केली होती; मात्र जवळपास १३० हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांना दिलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे जवळपास ३२८ शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून दुसरे बियाणे जादा पैसे देऊन खरेदी करुन दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- रहाटे सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मेहकर तालुक्यावर सतत निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे, शासनाकडूनही वेळेवर मदत न मिळणे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेले महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात महाबीज कंपनीवर कारवाई करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे यांनी केली आहे.उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेतून आलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. दरम्यान, अनेक ठिकाणचे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्याने शेतात जाऊन पाहणी केली. पंचनामा करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. -विजय सरोदेप्रभारी तालुका कृषी अधिकारी मेहकर.