शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यांची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: December 6, 2014 00:06 IST

बुलडाणा जिल्ह्यातील तीन अभयारण्यात मानवी हस्तेक्षप वाढला.

बुलडाणा : शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर या अभयारण्याची दैनावस्था होत असून, अभयारण्यातील मौल्यवान वनसं पदेसोबतच या अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर असे तीन अभयारण्य आहेत. मात्र, केवळ शासनाचे दुर्लक्ष, स्थानिक प्रशासनाची अनास्था आणि संबंधित विभागाकडे असलेली अपुरी साधने यामुळे या अभयारण्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत चालली आहे. या अभयारण्यात असलेल्या प्राणी तसेच पशुपक्षांची संख्या घटत चालली आहे. याला जबाबदार शासन असले तरी, संबंधित विभागामध्येच घरभेदी निघत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात सर्वात मोठे ज्ञानगंगा अभयारण्य आहे. २0३५६.६0 हेक्टर क्षेत्रावर या अभयारण्याची व्याप्ती आहे. १२७११.२४ हेक्टरवर अंबाबारवा अभयारण्य तर सर्वात लहान २६६.00 हेक्टरवर लोणारच्या जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याच्या सरोवराजवळ संरक्षित वन आहे. ज्ञानगंगा अभयारण्य हे तीन तालुक्यांत पसरलेले असून खामगाव व बुलडाणा या दोन मोठय़ा शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर आहे. जंगलातील मोठय़ा प्रमाणावर मौल्यवान वनसंपदा नष्ट होत चालली आहे. वृक्षतोड व जंगलातील औषधोपयोगी वनस्पतीची तस्करी केल्या जाते. याबरोबरच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या हरिण, रोही, काळविट, मोर, रानडुक्कर, लांडोर यासारख्या पशुपक्षांच्या शिकारीमध्ये वाढ होत आहे. परिणामी, प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. अभयारण्यात माणसांचा वावर नसावा असा नियम असताना ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रामध्ये आजही वस्त्या असलेली गावे आहेत. या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून पडून आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. मोठया प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने जंगलाचं देणं धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. हीच स्थिती लोणार सरोवर परिसरातील संरक्षित वनाची आहे. एकूणच जिल्ह्यातील अभयारण्य व संरक्षित वनाची शासनाच्या दुर्लक्षामुळे पार वाट लागली असून येणार्‍या काळात ही वनसंपदा नष्ट होऊ देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.