शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अभयारण्यांची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: December 6, 2014 00:06 IST

बुलडाणा जिल्ह्यातील तीन अभयारण्यात मानवी हस्तेक्षप वाढला.

बुलडाणा : शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर या अभयारण्याची दैनावस्था होत असून, अभयारण्यातील मौल्यवान वनसं पदेसोबतच या अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर असे तीन अभयारण्य आहेत. मात्र, केवळ शासनाचे दुर्लक्ष, स्थानिक प्रशासनाची अनास्था आणि संबंधित विभागाकडे असलेली अपुरी साधने यामुळे या अभयारण्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत चालली आहे. या अभयारण्यात असलेल्या प्राणी तसेच पशुपक्षांची संख्या घटत चालली आहे. याला जबाबदार शासन असले तरी, संबंधित विभागामध्येच घरभेदी निघत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात सर्वात मोठे ज्ञानगंगा अभयारण्य आहे. २0३५६.६0 हेक्टर क्षेत्रावर या अभयारण्याची व्याप्ती आहे. १२७११.२४ हेक्टरवर अंबाबारवा अभयारण्य तर सर्वात लहान २६६.00 हेक्टरवर लोणारच्या जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याच्या सरोवराजवळ संरक्षित वन आहे. ज्ञानगंगा अभयारण्य हे तीन तालुक्यांत पसरलेले असून खामगाव व बुलडाणा या दोन मोठय़ा शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर आहे. जंगलातील मोठय़ा प्रमाणावर मौल्यवान वनसंपदा नष्ट होत चालली आहे. वृक्षतोड व जंगलातील औषधोपयोगी वनस्पतीची तस्करी केल्या जाते. याबरोबरच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या हरिण, रोही, काळविट, मोर, रानडुक्कर, लांडोर यासारख्या पशुपक्षांच्या शिकारीमध्ये वाढ होत आहे. परिणामी, प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. अभयारण्यात माणसांचा वावर नसावा असा नियम असताना ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रामध्ये आजही वस्त्या असलेली गावे आहेत. या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून पडून आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. मोठया प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने जंगलाचं देणं धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. हीच स्थिती लोणार सरोवर परिसरातील संरक्षित वनाची आहे. एकूणच जिल्ह्यातील अभयारण्य व संरक्षित वनाची शासनाच्या दुर्लक्षामुळे पार वाट लागली असून येणार्‍या काळात ही वनसंपदा नष्ट होऊ देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.