शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन ...

बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन हिरावले गेले. या आरोग्य, आर्थिक चिंतेच्या कठीणकाळात काैटुंबिक कलह वाढले. बुलडाणा जिल्ह्यात अशा प्रकरणाची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये भराेसा सेलने समझाैता घडवला आहे.

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने गतवर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे अनेकांचा राेजगार हिरावला हाेता. आर्थिक संकटामुळे कुटुंबात कलह वाढले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात पती अतिमद्य सेवन करताे, पती किंवा पत्नीचे अनैतिक संंबंध, सासरकडील मंडळींची संसारात लुडबुड आदी कारणांमुळे वाद हाेतात. काैटुंबिक कलह साेडविण्यासाठी भराेसा सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या सेलकडे जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये ४४६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १३२ तक्रारींमध्ये समझाैता करण्यात आला आहे. भराेसा सेलच्या वतीने पती व पत्नीचे समुपदेशन करण्यात येते. यासाठी भराेसा सेलच्या प्रमुख एपीआय अलका निकाळजे, एएसआय अलका सरदार, हेडकाॅन्स्टेबल कल्पना गवई, एनपीसी सूर्यकिरण साबळे परिश्रम घेत आहेत.

७२ पती-पत्नीचे साेडवले भांडण

भराेसा सेलकडे सन २०२१मध्ये मे महिन्यापर्यंत एकूण २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये समझाैता घडवण्यात आला आहे. गेल्यावर्षी एकूण ४४६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १३२ प्रकरणांमध्ये समुपदेशानातून समझाैता घडवण्यात आला आहे. छाेट्या छाेट्या कारणांवरून हाेणारे वाद विकाेपाला जाऊन तक्रारीपर्यंत जात असल्याचे चित्र आहे.

पतीने मद्य प्राशन हेच कारण

भराेसा सेलमध्ये आलेल्या बहुतांश तक्रारींमध्ये पतीचे मद्य प्राशन हे महत्त्वाचे कारण असते. तसेच पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध, पत्नीच्या आईची किंवा बहिणीची संसारात लुडबुड करणे, पतीच्या आईवडिलांची लुडबुड आदींमुळे वाद हाेतात तसेच काही वेळा समजून घेण्याची तयारी नसल्याने वाद वाढतच जातात.

लग्नाच्या दहा दिवसातच वाद

लग्न झाल्यानंतर दहा दिवसातच पती-पत्नीमध्ये वाद झाले हाेते. गैरसमजुतीतून हे वाद वाढतच गेल्याने आठ ते दहा महिने ती मुलगी माहेरीच राहिली हाेती. तिला नांदायला नेण्यासाठी पती टाळाटाळ करीत हाेता. भराेसा सेलकडे हे प्रकरण आल्यानंतर दाेघांचेही समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर आता त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे.

कठोर नियमांमुळे घडले वितुष्ट

भराेसा सेलमध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणामध्ये घरातील शिस्तीमुळे वाद झाला हाेता. घरात वागणुकीसाठी असलेल्या नियमांचे पालन करणे नवविवाहितेला शक्य झाले नाही. त्यामुळे, वाद तक्रारीपर्यंत गेले. भराेसा सेलमधील कर्मचाऱ्यांनी पती व पत्नीचे समुपदेशन केले. त्यानंतर पती व पत्नी यांना आपली चूक लक्षात आली. सध्या दाेघांचा संसार सुरळीत सुरू झाला आहे.

दुसऱ्या लाॅकडाऊनमुळे वाद झाल्याच्या तक्रारी जिल्ह्यामध्ये कमी आहेत. काैटुंबिक वाद हाेण्याची कारणे नेहमीसारखीच आहेत. भराेसा सेलकडे जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये समझाैता घडवण्यात आला आहे.

- अलका निकाळजे, भराेसा सेलप्रमुख, बुलडाणा