शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव!

By admin | Updated: May 24, 2017 01:07 IST

पार्डी येथील ग्रामस्थ आक्रमक: अधिकाऱ्यांसमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : मेहकर तालुक्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईसाठी बळी गेलेल्या महिलेच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.१९ मे रोजी गावातील सावित्री सहदेव घुगे ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असता, विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, गटविकास अधिकारी पवार, उपअभियंता खिल्लारे गावामध्ये गेले. गावामध्ये ग्रामस्थांनीअधिकाऱ्यांना घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलाविले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.माजी मंत्री सुबोध सावजी हे २२ मे रोजी पार्डी येथे होगे परिवाराच्या सांत्वनासाठी गेल्यानंतर त्यांना कोणताही अधिकारी साधी भेट देण्यासाठीसुद्धा पोहोचलेला नसल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी तेथूनच आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आदींना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करीत पाणीटंचाईची दाहकता कथन केली. त्यामुळे आयुक्तांनी दखल घेतल्याने जिल्हा प्रशासन खळबळून जागे होऊन उपविभागीय अधिकारी डॉ.अपार मंगळवारी पार्डी गावात पोहोचले होते. यावेळी गावकऱ्यांनी तप्त उन्हात डॉ. अपार यांना घेराव घालून उन्हातच उभे केले. अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर गावात पोलीस आले व तीन तासानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सोडले. पाण्यासाठी बायको मेली, आता मी फाशी घेतो!पाण्यासाठी बायको मेली, आता असे तरसू तरसू मारु नका, ही दोरी घ्या आणि एकदाच फाशी देऊन मारुन टाका, नाही तर मी फाशी घेतो, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी सहदेव होगे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. सहदेव घुगे यांच्या पत्नीचा १९ मे रोजी पाण्यासाठी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. सहदेव घुगे यांच्या मागणीने सर्व जण अवाक झाले होते. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- सुबोध सावजी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला असला तरी ही परिस्थिती निर्माण होण्याकरिता अधिकारी जबाबदार आहेत. गावात अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई आतापर्यंत दूर करायला हवी होती; मात्र तसे न झाल्यामुळे महिलेच्या मृत्यूसाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.