शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव!

By admin | Updated: May 24, 2017 01:07 IST

पार्डी येथील ग्रामस्थ आक्रमक: अधिकाऱ्यांसमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : मेहकर तालुक्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईसाठी बळी गेलेल्या महिलेच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.१९ मे रोजी गावातील सावित्री सहदेव घुगे ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असता, विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, गटविकास अधिकारी पवार, उपअभियंता खिल्लारे गावामध्ये गेले. गावामध्ये ग्रामस्थांनीअधिकाऱ्यांना घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलाविले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.माजी मंत्री सुबोध सावजी हे २२ मे रोजी पार्डी येथे होगे परिवाराच्या सांत्वनासाठी गेल्यानंतर त्यांना कोणताही अधिकारी साधी भेट देण्यासाठीसुद्धा पोहोचलेला नसल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी तेथूनच आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आदींना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करीत पाणीटंचाईची दाहकता कथन केली. त्यामुळे आयुक्तांनी दखल घेतल्याने जिल्हा प्रशासन खळबळून जागे होऊन उपविभागीय अधिकारी डॉ.अपार मंगळवारी पार्डी गावात पोहोचले होते. यावेळी गावकऱ्यांनी तप्त उन्हात डॉ. अपार यांना घेराव घालून उन्हातच उभे केले. अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर गावात पोलीस आले व तीन तासानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सोडले. पाण्यासाठी बायको मेली, आता मी फाशी घेतो!पाण्यासाठी बायको मेली, आता असे तरसू तरसू मारु नका, ही दोरी घ्या आणि एकदाच फाशी देऊन मारुन टाका, नाही तर मी फाशी घेतो, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी सहदेव होगे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. सहदेव घुगे यांच्या पत्नीचा १९ मे रोजी पाण्यासाठी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. सहदेव घुगे यांच्या मागणीने सर्व जण अवाक झाले होते. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- सुबोध सावजी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला असला तरी ही परिस्थिती निर्माण होण्याकरिता अधिकारी जबाबदार आहेत. गावात अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई आतापर्यंत दूर करायला हवी होती; मात्र तसे न झाल्यामुळे महिलेच्या मृत्यूसाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.