बुलडाणा : जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ८0२ जागांसाठी १४ हजार ४५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते; मात्र छाननीमध्ये २१ जुलै रोजी एकूण ४४५ अर्ज बाद झाल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या १४ हजार १0 झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा २३ जुलै हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर एकूण संख्या कळेल. जिल्ह्यात एकूण दाखल झालेल्या १४ हजार ४५५ उमेदवारी अर्जांपैकी ४४५ अर्ज बाद झाले, तर इच्छुक उमेदवारांचे १४ हजार १0 अर्ज मंजूर करण्यात आले. त्यात बुलडाणा तालुक्यातील १६0२, चिखली १६८७, देऊळगाव राजा ७५३, सिंदखेड राजा १00२, मेहकर १0४0, लोणार ४७९, मलकापूर ७७३, मोताळा १३४0, नांदूरा ११७१, खामगाव १९६४, शेगाव ८0६, जळगाव जामोद ६९६, संग्रामपूर तालुक्यातील ७१५ असे एकूण १४ हजार १0 अर्ज वैध ठरले. जिल्ह्यात प्रथमच ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे निवडणुकीस इच्छुक उमेदवारांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी नाना कसरती कराव्.ा लागल्या. काही ठिकाणी गावातील ज्येष्ठ नेत्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मदत केली. दरम्यान, २३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ असल्यामुळे अनेक उमेदवारांची त्यासाठी मनधरणी सुरू आहे. ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार ग्रामंपचायत निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन अर्ज दाखल होत असल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व २५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण १४ हजार ४५५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत एकूण ४४५ अर्ज बाद झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या १४ हजार १0 झाली. अर्ज मागे घेण्याचा २३ जुलै हा शेवटचा दिवस असून, दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीत किती उमेदवार कायम राहतात, हे कळणार आहे. निवडणूक रणधुमाळीची रंगत त्यानंतरच खुलणार आहे.
छाननीमध्ये ४४५ उमेदवारी अर्ज अवैध
By admin | Updated: July 22, 2015 23:48 IST