शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

 ‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:44 IST

आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे.

-ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे १ हजार ८ शेतकरी लाभार्थी आहेत. आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे.शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येतात. अनेक शेतकरी शेतीबरोबरच विविध व्यवसायही करत आहेत. शेतकºयांना शेतीसोबतच पूरक व्यवसायाला हातभार लागण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू आहे. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी चार हजार गावे व विदर्भातील पूर्णा नदी खोºयातील खारपाणपट्टयातील ९३२ गावे अशा एकूण पाच हजार १४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत ३९६ गावांमध्ये या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.१९ सप्टेंबपर्यंत या योजेलचा १ हजार ८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. परंतू या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी संख्येत आता चांगलीच वाढ होणार आहे. हा प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकºयांबरोबरच पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये परसातील कुक्कुटपालन, शेततळे, ठिबक सिंचन, पीव्हीसी/एचडीपीई पाइप, शेडनेटमधील लागवड साहित्य, बिजोत्पादन, फळलागवड, बंदिस्त शेळीपालन, तुषार सिंचन, विद्युत मोटार, विहिर पुनर्भरण, शेडनेट या घटकांसाठी शेतकºयांना लाभ दिला जात आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. तसे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.- उमेश जाधव,प्रकल्प विशेषज्ञ, (कृषी),नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना