शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बुलडाणा जिल्ह्यातील शाळा सुरू, मात्र महाविद्यालये बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:14 IST

Buldhana News महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  काेराेना महामारीचे संकटत पाहता, मार्च महिन्यांपासून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद केले हाेते. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, शासनाने ५ ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. मार्च महिन्यांपासून काेराेनामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अध्यापन सुरू असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी त्रस्त झाले आहे.  काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सुरुवातीला ९ वी ते १२वीपर्यंत शाळा सुरू केल्या हाेत्या. त्यानंतर, २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याविषयी शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थी जागरूक आहेत. मात्र, तरीही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

महाविद्यालये सुरू हाेण्याची प्रतीक्षा लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या मात्र, महाविद्यालये सुरू करण्यासाठी केवळ चर्चाच सुरू आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे. अनेक महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कच राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 

लहान मुलांच्या शाळा शासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, माेठ्या मुलांचे महाविद्यालये बंदच आहेत. गत ९ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे, शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. - पूजा पवार, विद्यार्थीनी  

गत ९ महिन्यांपासून केवळ आऑनलाइन क्लास सुरू आहे. अनेकवेळा नेटवर्क राहत नसल्यने अध्ययन व्यवस्थीत हाेत नाही. शासनाने काेराेना विषयक नियमांचे पालन करून महाविद्यालये सरू करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमही मागे पडला आहे. - शेफाली जाधव, विद्यार्थीनी  

काेराेनामुळे महाविद्यालये बंदच आहेत. परीक्षाही आऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेउन एक महिना झाला. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू झाले नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान हाेत आहे. महाविद्याये सुरू करण्याची गरज आहे.- राेहन खरे, विद्यार्थी

मार्च महिन्यांपासून  महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. शासनाने लहान मुलांच्या शाळा सुरू केल्या असल्या तरी महाविद्यालये सुरु केले नाही. त्यामुळे, शासनाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची गरज आहे. - अक्षय गाेळे, विद्यार्थी

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालय