शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने साहित्याची जबाबदारी शाळांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:59 IST

Schools News : शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : संचारबंदीमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर बारावीची परीक्षा सध्या होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आपले आहे. मात्र, यादरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. अशातच शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.संचारबंदीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बोर्डाच्या परीक्षा सोडून पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न देता पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे. तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील ओझे काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. दहावीची २३, तर १२ वीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय व माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा,  तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. परिणामी, शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्य:स्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य संभाळणे ही मोठी जबाबदारी असल्यामुळे शाळांतील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे.

परीक्षा कधी?दहावी बारावीच्या लेखी ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलून बारावीच्या परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा विचार होता. मात्र, आता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दहावीच्या साहित्यासंदर्भात नवीन निर्णय येईपर्यंत शाळांना ते साहित्य जपावे लागणार असून, नंतर सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे. बारावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मुख्याध्यापक म्हणतात... 

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे साहित्य १२ एप्रिलला मिळाले होते. हे सर्व साहित्य सांभाळणे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. आपण सर्व साहित्य व्यवस्थित कुलूपबंद ठेवले आहे. आता दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्या. त्यामुळे बोर्डाचे जे आदेश येतील, त्यानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.-सुरेश हिवरकर, मुख्याध्यापक 

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळाexamपरीक्षा