शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात समाधानकारक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

मेहकर : खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र नंतर उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त ...

मेहकर : खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र नंतर उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. बुधवारी समाधानकारक पाऊस झाल्याने तूर्तास शेतकरी समाधानी झाले आहेत.

खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी सर्व तयारी केली होती. सुरूवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मात्र नंतर पाऊस जोराचे झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे बियाणे निघालेच नाही.तर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली.तर पावसाने उघडीप दिल्याने त्यांचे बियाणे उगवलेच नाही.या दोन्ही कारणांमुळे मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांच्या भावाने तर उच्चांक गाठला होता.यामुळे बियाणे व खते यांचा ताळमेळ लावताना शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला होता. यात काही ठिकाणी दुबार पेरणी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाच्या खंडानंतर बुधवारी तालुक्यात पाऊस झाल्याने तूर्तास शेतकरी सुखावला आहे.

मी शेतात पेरणी केली.मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. यामुळे मला याच शेतात दुबार पेरणी करावी लागली आहे. सुनील अंबादास तांगडे, शेतकरी,पारडा