शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

संग्रामपुरात ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

By admin | Updated: November 4, 2015 02:54 IST

शेतक-यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करण्याची मागणी.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : शेतकर्‍यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करा, शेतकर्‍यांना प्रती एकरी ५0 हजार रुपये नगदी स्वरूपात मदत द्या, कृषीपंपांचे वीज बिल १00 टक्के माफ करा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात ३ नोव्हेंबरला संग्रामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. संग्रामपूर बस स्टॅण्डपासून दुपारी एक वाजता सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेल्यावर मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकर्‍यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला. आपल्या समस्या आपणच सोडवायच्या असतात, त्याकरिता शेतकरी व शेतमजुरांनी एकत्र होऊन लढा द्यावा, असे आवाहन प्रशांत डिक्कर यांनी उपस्थित शेतकर्‍यांना केले, तसेच कैलास फाटे यांनीसुद्धा उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सदस्य गिरधर देशमुख, सुधीर देशमुख, राजू वाकोडे, उमेश मोरखडे, अनिल मिरगे, संतोष गाळकर, समाधान भातुरकर, सोपान खंडारे, सुरेश राखोंडे, विनोद खिरोडकर, ज्ञानेश्‍वर गोल्हर, राहुल पाखरे, गणेश वैतकर, नीलेशनाथ पाटील व अन्य पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांंसह हजारोंच्यावर शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शेतकर्‍यांनी यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत दुष्काळी मदत त्वरेने देण्याची मागणी केली.