शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

संस्कारहीन मनुष्य प्राण्यासारखाच - मठाधिपती शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:17 IST

संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: जीवनातील विविध संस्कार हे उत्तम चारित्र्याचे आभूषण आहेत. संस्कारामुळेच समाज आणि परमात्म्याची सेवा घडते. मानवी जीवनात संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. याउलट संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.

शेलोडी येथे आयोजित जागृती परिवाराच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवनसेवाव्रती राधादीदी, सुमित्रादीदी, ह.भ.प. काळे महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी प.पू. शंकर महाराज पुढे म्हणाले की, सेवा कार्यासाठी २० वर्षांपूर्वी जागृतीची स्थापना करण्यात आली. हजारो हात जागृतीच्या सेवाकार्यात लागले. अनेकांच्या परिश्रमातून, त्यागातून जागृतीचा वटवृक्ष झाला. मात्र, समाज उत्थानाचे हे कार्य सहजासहजी घडले नाही. समाज उत्थानाच्या या मार्गात खूप त्रास झाला. दु:ख आलीत. काहींनी खूप त्रास दिला. या कालावधीत पेरलं ते उगवलच नाही, याची कायम खंत राहील. मात्र,  त्रास देणाºयांपेक्षा समाज उत्थानांच्या कार्यात झोकून देणाºयांची संख्या ही कितीतरी पटीने अधिक आहे. हीच माझी आणि जागृतीचे बळ आहे. म्हणूनच कितीही त्रास झाला, तरी यापुढे  समाज उत्थानाच्या कार्यापासून आपण अजिबात दूर जाणार नाही. भविष्यात येणाºया प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम असल्याची ग्वाही दिली.  ही ग्वाही दसरा मेळाव्याला उपस्थित भाविकांना ‘गुरूदक्षिणा’च मिळाली. एका मोठ्या दु:खद प्रसंगानंतर जागृती पिठात आयोजित हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्याला भाविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी अशोक  राऊत यांच्यासह जागृतीच्या सेवा कार्यात झटणाºयांचा सत्कार करण्यात आला.जागृती परिवाराचे प्रमोद पाटील यांच्यासह हजारावर भाविकांची यावेळी उपस्थिती होती.

शुभ दर्शनाचा ‘डोळा’ महत्वाचा!

सत्यदर्शन होत नाही, त्यांना डोळे म्हणून नये. संवदेना कळत नाही,ते मन नाही आणि अंतकरणात प्रेम नाही ते जीवनव्यर्थ आहे. अंतरात्मा आणि परमात्म्याचा आवाज ऐकू येत नाही, त्यांना कान म्हणू नये, असे नि:क्षून सांगतानाच, आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, कधी नेतृत्व करून तर कधी सेवाधारी होवून समाजाचे कल्याण करा!, असा उपदेशही त्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक