शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

संस्कारहीन मनुष्य प्राण्यासारखाच - मठाधिपती शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:17 IST

संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: जीवनातील विविध संस्कार हे उत्तम चारित्र्याचे आभूषण आहेत. संस्कारामुळेच समाज आणि परमात्म्याची सेवा घडते. मानवी जीवनात संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. याउलट संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.

शेलोडी येथे आयोजित जागृती परिवाराच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवनसेवाव्रती राधादीदी, सुमित्रादीदी, ह.भ.प. काळे महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी प.पू. शंकर महाराज पुढे म्हणाले की, सेवा कार्यासाठी २० वर्षांपूर्वी जागृतीची स्थापना करण्यात आली. हजारो हात जागृतीच्या सेवाकार्यात लागले. अनेकांच्या परिश्रमातून, त्यागातून जागृतीचा वटवृक्ष झाला. मात्र, समाज उत्थानाचे हे कार्य सहजासहजी घडले नाही. समाज उत्थानाच्या या मार्गात खूप त्रास झाला. दु:ख आलीत. काहींनी खूप त्रास दिला. या कालावधीत पेरलं ते उगवलच नाही, याची कायम खंत राहील. मात्र,  त्रास देणाºयांपेक्षा समाज उत्थानांच्या कार्यात झोकून देणाºयांची संख्या ही कितीतरी पटीने अधिक आहे. हीच माझी आणि जागृतीचे बळ आहे. म्हणूनच कितीही त्रास झाला, तरी यापुढे  समाज उत्थानाच्या कार्यापासून आपण अजिबात दूर जाणार नाही. भविष्यात येणाºया प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम असल्याची ग्वाही दिली.  ही ग्वाही दसरा मेळाव्याला उपस्थित भाविकांना ‘गुरूदक्षिणा’च मिळाली. एका मोठ्या दु:खद प्रसंगानंतर जागृती पिठात आयोजित हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्याला भाविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी अशोक  राऊत यांच्यासह जागृतीच्या सेवा कार्यात झटणाºयांचा सत्कार करण्यात आला.जागृती परिवाराचे प्रमोद पाटील यांच्यासह हजारावर भाविकांची यावेळी उपस्थिती होती.

शुभ दर्शनाचा ‘डोळा’ महत्वाचा!

सत्यदर्शन होत नाही, त्यांना डोळे म्हणून नये. संवदेना कळत नाही,ते मन नाही आणि अंतकरणात प्रेम नाही ते जीवनव्यर्थ आहे. अंतरात्मा आणि परमात्म्याचा आवाज ऐकू येत नाही, त्यांना कान म्हणू नये, असे नि:क्षून सांगतानाच, आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, कधी नेतृत्व करून तर कधी सेवाधारी होवून समाजाचे कल्याण करा!, असा उपदेशही त्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक