शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारहीन मनुष्य प्राण्यासारखाच - मठाधिपती शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:17 IST

संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: जीवनातील विविध संस्कार हे उत्तम चारित्र्याचे आभूषण आहेत. संस्कारामुळेच समाज आणि परमात्म्याची सेवा घडते. मानवी जीवनात संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. याउलट संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.

शेलोडी येथे आयोजित जागृती परिवाराच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवनसेवाव्रती राधादीदी, सुमित्रादीदी, ह.भ.प. काळे महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी प.पू. शंकर महाराज पुढे म्हणाले की, सेवा कार्यासाठी २० वर्षांपूर्वी जागृतीची स्थापना करण्यात आली. हजारो हात जागृतीच्या सेवाकार्यात लागले. अनेकांच्या परिश्रमातून, त्यागातून जागृतीचा वटवृक्ष झाला. मात्र, समाज उत्थानाचे हे कार्य सहजासहजी घडले नाही. समाज उत्थानाच्या या मार्गात खूप त्रास झाला. दु:ख आलीत. काहींनी खूप त्रास दिला. या कालावधीत पेरलं ते उगवलच नाही, याची कायम खंत राहील. मात्र,  त्रास देणाºयांपेक्षा समाज उत्थानांच्या कार्यात झोकून देणाºयांची संख्या ही कितीतरी पटीने अधिक आहे. हीच माझी आणि जागृतीचे बळ आहे. म्हणूनच कितीही त्रास झाला, तरी यापुढे  समाज उत्थानाच्या कार्यापासून आपण अजिबात दूर जाणार नाही. भविष्यात येणाºया प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम असल्याची ग्वाही दिली.  ही ग्वाही दसरा मेळाव्याला उपस्थित भाविकांना ‘गुरूदक्षिणा’च मिळाली. एका मोठ्या दु:खद प्रसंगानंतर जागृती पिठात आयोजित हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्याला भाविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी अशोक  राऊत यांच्यासह जागृतीच्या सेवा कार्यात झटणाºयांचा सत्कार करण्यात आला.जागृती परिवाराचे प्रमोद पाटील यांच्यासह हजारावर भाविकांची यावेळी उपस्थिती होती.

शुभ दर्शनाचा ‘डोळा’ महत्वाचा!

सत्यदर्शन होत नाही, त्यांना डोळे म्हणून नये. संवदेना कळत नाही,ते मन नाही आणि अंतकरणात प्रेम नाही ते जीवनव्यर्थ आहे. अंतरात्मा आणि परमात्म्याचा आवाज ऐकू येत नाही, त्यांना कान म्हणू नये, असे नि:क्षून सांगतानाच, आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, कधी नेतृत्व करून तर कधी सेवाधारी होवून समाजाचे कल्याण करा!, असा उपदेशही त्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक