शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

तीच गावे, त्याच उपाययोजना आता दुष्काळी झळा!

By admin | Updated: April 4, 2016 02:03 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते.

बुलडाणा : 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे उन्हाळाही नियमित येतो व येताना बुलडाणा जिल्ह्याच्या नशिबी पाणीटंचाईचा शाप घेऊन येतो. या वर्षी तर दुष्काळाचा चटका बसत आहे. गेल्या दहा वर्षांंंचा आढावा घेतला तर पर्जन्यमान कितीही होवो, जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते व या गावांमध्ये प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. टंचाईची गावे तीच, टंचाई निवारण्यासाठी राबविल्या जाणार्‍या उपाययोजनाही त्याच. खर्च मात्र दरवर्षी वाढताच. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने टंचाईचा खर्च हा जिल्ह्यासाठी पांढरा हत्ती ठरला आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४२७ गावे आहेत. मात्र, या गावांपैकी ६८८ पासून ८८४ गावांमध्ये पाणीटंचाई गेल्या दहा वर्षांंमध्ये राहिलेली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी दरवर्षी बुडकी घेणे, विहीर खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना घेणे, हय़ाच उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात पाऊस कितीही पडो, टंचाईची गावे मात्र हीच कायम आहेत. बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड, हतेडी, देवपूर, देऊळघाट, पळसखेड नाईक, येळगाव, अटकळ, पाडळी. चिखलीमधील आंधई, पळसखेड सपकाळ. मेहकरमधील हिवरा साबळे, घुटी, जवळा, पार्डी, बारडा, आंध्रुड, नागापूर, नागेशवाडी. खामगावमधील पिंप्राळा, बोरजवळा, कुंबेफळ, नागापूरवाडी, लोखंडा, निपाणा. शेगाव तालुक्यातील जवळा कुरखेड, माटरगाव, काबरखेड. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव कुंड, बोरखेड, निमखेड, बेलाड, मलकापूर ग्रामीण. मोताळा तालुक्यातील निपाणा, दाभाडी, टाकळी वाघजाळ, जहांगीरपूर, धोलखेड, सारोळा मारोती, नाईकनगर, लपाली, कोल्हीगवळी, नळकुंड, डिडोळा खुर्द. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी, भालेगाव, वडगाव डिघी, वडगाव नवे, सावरगाव, शेंबा, पोफळी, तांदूळवाडी, फुली, टाकरखेड, खैरा, शेंबा खु., खेडी व चांदुरबिस्वा हीच गावे आलटून पालटून टंचाईग्रस्त राहिलेली आहेत. या गावांमध्ये उपाययोजना होतात; मात्र त्या केवळ टंचाईपुरत्याच. कायमस्वरूपी उपाययोजना शासन करणार का? हा प्रश्न मात्र दरवर्षी अनुत्तरीतच राहतो.