शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तीच गावे, त्याच उपाययोजना आता दुष्काळी झळा!

By admin | Updated: April 4, 2016 02:03 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते.

बुलडाणा : 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे उन्हाळाही नियमित येतो व येताना बुलडाणा जिल्ह्याच्या नशिबी पाणीटंचाईचा शाप घेऊन येतो. या वर्षी तर दुष्काळाचा चटका बसत आहे. गेल्या दहा वर्षांंंचा आढावा घेतला तर पर्जन्यमान कितीही होवो, जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते व या गावांमध्ये प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. टंचाईची गावे तीच, टंचाई निवारण्यासाठी राबविल्या जाणार्‍या उपाययोजनाही त्याच. खर्च मात्र दरवर्षी वाढताच. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने टंचाईचा खर्च हा जिल्ह्यासाठी पांढरा हत्ती ठरला आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४२७ गावे आहेत. मात्र, या गावांपैकी ६८८ पासून ८८४ गावांमध्ये पाणीटंचाई गेल्या दहा वर्षांंमध्ये राहिलेली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी दरवर्षी बुडकी घेणे, विहीर खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना घेणे, हय़ाच उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात पाऊस कितीही पडो, टंचाईची गावे मात्र हीच कायम आहेत. बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड, हतेडी, देवपूर, देऊळघाट, पळसखेड नाईक, येळगाव, अटकळ, पाडळी. चिखलीमधील आंधई, पळसखेड सपकाळ. मेहकरमधील हिवरा साबळे, घुटी, जवळा, पार्डी, बारडा, आंध्रुड, नागापूर, नागेशवाडी. खामगावमधील पिंप्राळा, बोरजवळा, कुंबेफळ, नागापूरवाडी, लोखंडा, निपाणा. शेगाव तालुक्यातील जवळा कुरखेड, माटरगाव, काबरखेड. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव कुंड, बोरखेड, निमखेड, बेलाड, मलकापूर ग्रामीण. मोताळा तालुक्यातील निपाणा, दाभाडी, टाकळी वाघजाळ, जहांगीरपूर, धोलखेड, सारोळा मारोती, नाईकनगर, लपाली, कोल्हीगवळी, नळकुंड, डिडोळा खुर्द. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी, भालेगाव, वडगाव डिघी, वडगाव नवे, सावरगाव, शेंबा, पोफळी, तांदूळवाडी, फुली, टाकरखेड, खैरा, शेंबा खु., खेडी व चांदुरबिस्वा हीच गावे आलटून पालटून टंचाईग्रस्त राहिलेली आहेत. या गावांमध्ये उपाययोजना होतात; मात्र त्या केवळ टंचाईपुरत्याच. कायमस्वरूपी उपाययोजना शासन करणार का? हा प्रश्न मात्र दरवर्षी अनुत्तरीतच राहतो.