शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

२५ किलो बियाण्यांच्या भावात एक क्विंटल सोयाबिनची विक्री; जगावे तरी कसे? शेतकऱ्यांंचा प्रश्न

By विवेक चांदुरकर | Updated: December 27, 2023 17:08 IST

शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे तब्बल ४ हजार ते ४२०० रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे.

विवेक चांदूरकर, खामगाव : शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे तब्बल ४ हजार ते ४२०० रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. तर सध्या सोयाबिनच्या भावात घट झाली असून शेतकर्यांना केवळ ४ हजार ते ४५०० रूपयांमध्ये एक क्विंटल सोयाबिन विकावे लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी उत्पन्न झाल्याने जगावे तरी कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सोयाबिन जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. यावर्षी जिल्ह्यात ७ लाख २५ हजार ५२१ क्षेत्रापैकी तब्बल ४ लाख १८ हजार १२८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगामात उशीरा पाऊस झाल्याने पेरणी लांबली. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील मातीसह पीक वाहून गेले. सोयाबिनवर विविध किडींनी आक्रमण केले. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट आली आहे. शेतकर्यांना तीन ते चार क्विंटल उत्पादन झाले. त्यातही सध्या अल्प भाव मिळत आहे. शेतकर्यांना चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे ४ हजार ते ४२०० रूपयांना विकत घ्यावे लागते. तर अन्य कंपन्यांचे बियाण्यांचे भावही ३ हजार ते ३५०० रूपये आहे. त्यानंतर एका एकरासाठी नागरटी ५०० रूपये, पेरणीचे मजुरी ५०० रूपये, खत १५०० रूपये, तणनाशक १ हजार, किटकनाशक १ हजार, सोंगणी २५०० रूपये, काढणीचा २५०० रूपये खर्च येतो.

 शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेण्याकरिता याचा खर्चही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे शेतकर्यांना एका एकराचा उत्पादन खर्चच १५ हजार रूपये आहे. तर एका एकरात चार क्विंटल उत्पादन झाले तर १८ हजार रूपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे वर्षभर अपार श्रम करून शेतकर्यांना फक्त ३ हजार रूपयेच एका एकरातून उरत आहेत.

एका एकराला लागणारा खर्च:

नागरटी ५०० रूपयेबियाणे ३००० ते ४००० रूपयेखत १५०० रूपयेनणनाशक १००० रूपयेकिटकनाशक १००० रूपयेसाेंगणी २५०० रूपयेकाढणी २५०० रूपयेशेतमाल विक्रीसाठी वाहन भाडे १००० रूपयेएकूण १३००० ते १४००० रूपये

सोयाबीनच्या भावात सातत्याने घट :

सोयाबीनच्या भावात गत दोन महिन्यात सातत्याने घट होत आहे. २८ ऑगस्ट रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४९०० ते ४३०० रुपये दर होते. या दिवशी १५ हजार ९६७ क्विंटल आवक झाली होती. तर २८ नोव्हेंबर रोजी ५०५० ते ३९०० रुपये दर होते. या दिवशी ४७४१ क्विंटल आवक झाली होती. २६ डिसेंबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४८०० ते ४२०० रुपये भाव होते. ५३३९ क्विंटल आवक झाली. गत एक महिन्यातच दोनशे रुपयांनी भाव घसरले.

सोयाबीनला नगदी पीक म्हटल्या जाते. सोयाबीनला यावर्षी अल्प भाव आहे. उत्पादनही खर्चही निघत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण कसे करावे, आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास कुणाला पैसे मागावे, महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जगावे तरी कसे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी