शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

२५ किलो बियाण्यांच्या भावात एक क्विंटल सोयाबिनची विक्री; जगावे तरी कसे? शेतकऱ्यांंचा प्रश्न

By विवेक चांदुरकर | Updated: December 27, 2023 17:08 IST

शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे तब्बल ४ हजार ते ४२०० रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे.

विवेक चांदूरकर, खामगाव : शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे तब्बल ४ हजार ते ४२०० रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. तर सध्या सोयाबिनच्या भावात घट झाली असून शेतकर्यांना केवळ ४ हजार ते ४५०० रूपयांमध्ये एक क्विंटल सोयाबिन विकावे लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी उत्पन्न झाल्याने जगावे तरी कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सोयाबिन जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. यावर्षी जिल्ह्यात ७ लाख २५ हजार ५२१ क्षेत्रापैकी तब्बल ४ लाख १८ हजार १२८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगामात उशीरा पाऊस झाल्याने पेरणी लांबली. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील मातीसह पीक वाहून गेले. सोयाबिनवर विविध किडींनी आक्रमण केले. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट आली आहे. शेतकर्यांना तीन ते चार क्विंटल उत्पादन झाले. त्यातही सध्या अल्प भाव मिळत आहे. शेतकर्यांना चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे ४ हजार ते ४२०० रूपयांना विकत घ्यावे लागते. तर अन्य कंपन्यांचे बियाण्यांचे भावही ३ हजार ते ३५०० रूपये आहे. त्यानंतर एका एकरासाठी नागरटी ५०० रूपये, पेरणीचे मजुरी ५०० रूपये, खत १५०० रूपये, तणनाशक १ हजार, किटकनाशक १ हजार, सोंगणी २५०० रूपये, काढणीचा २५०० रूपये खर्च येतो.

 शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेण्याकरिता याचा खर्चही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे शेतकर्यांना एका एकराचा उत्पादन खर्चच १५ हजार रूपये आहे. तर एका एकरात चार क्विंटल उत्पादन झाले तर १८ हजार रूपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे वर्षभर अपार श्रम करून शेतकर्यांना फक्त ३ हजार रूपयेच एका एकरातून उरत आहेत.

एका एकराला लागणारा खर्च:

नागरटी ५०० रूपयेबियाणे ३००० ते ४००० रूपयेखत १५०० रूपयेनणनाशक १००० रूपयेकिटकनाशक १००० रूपयेसाेंगणी २५०० रूपयेकाढणी २५०० रूपयेशेतमाल विक्रीसाठी वाहन भाडे १००० रूपयेएकूण १३००० ते १४००० रूपये

सोयाबीनच्या भावात सातत्याने घट :

सोयाबीनच्या भावात गत दोन महिन्यात सातत्याने घट होत आहे. २८ ऑगस्ट रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४९०० ते ४३०० रुपये दर होते. या दिवशी १५ हजार ९६७ क्विंटल आवक झाली होती. तर २८ नोव्हेंबर रोजी ५०५० ते ३९०० रुपये दर होते. या दिवशी ४७४१ क्विंटल आवक झाली होती. २६ डिसेंबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४८०० ते ४२०० रुपये भाव होते. ५३३९ क्विंटल आवक झाली. गत एक महिन्यातच दोनशे रुपयांनी भाव घसरले.

सोयाबीनला नगदी पीक म्हटल्या जाते. सोयाबीनला यावर्षी अल्प भाव आहे. उत्पादनही खर्चही निघत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण कसे करावे, आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास कुणाला पैसे मागावे, महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जगावे तरी कसे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी