शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

संत सोपान काका दिंडीला ७८ वर्षांनंतर खंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST

साखरखेर्डा : मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज या छोट्याशा गावातून ७८ वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा यावर्षी कोरोना संसर्गामुळे खंडित ...

साखरखेर्डा : मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज या छोट्याशा गावातून ७८ वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा यावर्षी कोरोना संसर्गामुळे खंडित झाली आहे. सोपान काका यांचे शिष्य माणिकराव ढवळे यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून ही परंपरा सुरू केली होती. त्यांच्या दिंडीला सोपानकाका पालखी सोहळ्यात सर्वप्रथम मानाचे स्थान आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंज या छोट्याशा गावात माणिकराव गोविंदराव ढवळे यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासून हरिनामात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भक्तीचा छंद त्यांना लागला. शेती, प्रपंच याकडे फारसे लक्ष दिले नाही. ते वयाच्या १२ व्या वर्षी पंढरपुरात जाऊन स्थायिक झाले. चार वर्षे तेथे पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन सेवा केली. वयाच्या सोळाव्या वर्षी गुंज येथून पायी दिंडी प्रवास सुरू केला. डोक्यावर ओझे घेऊन अनवाणी पायाने चालत, मुखातून हरिनामाचा गजर करीत २५ ते ३० वारकऱ्यांना सोबत घेऊन दरकोस दर मुक्काम करीत यांची दिंडी १९४२ मध्ये संत सोपान काका यांच्या दिंडीत सामील झाली. १९४२ ते २०११ पर्यंत म्हणजे ६९ वर्षे माणिकराव गोविंदराव ढवळे यांनी सोपान काकाची दिंडी म्हणून गुंज ते पंढरपूर असा अखंड वारी सोहळा केला. २५ जुलै २०११ ला त्यांनी पंढरपूर वारीतून परत येत असताना आपला देह ठेवला. ही परंपरा खंडित राहू नये, म्हणून त्यांची मुलगी भागिरथाबाई यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार करीत वडिलांच्या पश्चात वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन पंढरपूर वारी सोहळा अखंडपणे सुरू ठेवला.

आई-वडिलांसोबत भागिरथीबाई यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून दिंडी प्रवास सुरू केला होता. त्यामुळे त्या सर्वांच्या परिचित आणि धार्मिक वृत्तीच्या असल्याने हा मान त्यांना मिळाला. गेल्या ८ वर्षांपासून या पायी वारीचे नेतृत्व त्या अविरत करीत आहेत.

दिंडीला पहिला मान

गुंज येथून पैठण, निळोबाराय, पिंपळनेर, देहू, आळंदी, पुणे, असा वारी दिंडी सोहळा सासवडला पोहचल्यानंतर सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात पहिला मान यांचा आहे. आजपर्यंत हा दिंडी सोहळा अविरत सुरू असून, यावर्षी ७९ वर्षे पूर्ण होणार होते; परंतु सलग दुसऱ्या वर्षीही त्यांचा दिंडी सोहळा रद्द झाल्याने उत्सवापासून वंचित राहावे लागत आहे; पण काेविड १९ मुळे परवानगी नसल्याने आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाता घरीच गुंज गावात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करणार आहे.

आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी प्रवास करताना माणिकराव ढवळे यांना दुष्काळाचे अनेक चटके सहन करावे लागले. तरीही त्या संकटांना सामोरे जात त्यांनी सोपान काका पालखी सोहळ्यात आपली वारकरी दिंडी मानाची दिंडी म्हणून प्रथम स्थान कायम राखले. ती परंपरा मी अविरत चालू ठेवणार आहे.

भागिरथाबाई माणिकराव ढवळे.