शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
3
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
4
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
5
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
6
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
8
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
9
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
10
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
11
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
12
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
13
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
14
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
15
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
16
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
17
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
18
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
19
तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
20
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

सद्दाम’ बनला ग्रामपरिवर्तन अभियानाचा ‘दुत’: नऊ महिन्यात केला जांभळी गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:21 IST

धामणगाव बढे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन अभियानात ‘ग्राम दुत’ बनून धामणगाव बढे येथील २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गट ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे.

ठळक मुद्देधामणगाव बढे येथील २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गट ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे. राज्यातील दुर्गम भागातील २४८ गावात १४२ ग्रामदुतांच्या माध्यमातून ग्राम परिवर्तनाची चळवळ राबविण्यास प्रारंभ झाला. सातत्यपूर्ण प्रयत्नाद्वारे प्रशासनाच्या सहकार्यातून मोठा निधी त्याने गावाच्या विकासासाठी वळविला.

- नवीन मोदे

धामणगाव बढे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन अभियानात ‘ग्राम दुत’ बनून धामणगाव बढे येथील २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गट ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे. विकासाच्या मुख्य प्रवासापासून हे गाव बरेच दूर होते.गाव विकासाच्या निधीवर भ्रष्टाचाराची चढाओढ लागलेली असताना सद्दामचे हे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारे आहे. ग्राम परिवर्तन अभियानात राज्यातील विविध घटकांना एकत्र आणून माणूस केंद्र बिंदू मानीत त्यास आरोग्य, शिक्षण, रोजगार , पाणीपुरवठा या सामाजिक सुविधां देण्याच्या मानकांनी परिपूर्ण करण्यासाठी राज्यात राबविले जात आहे. २ एप्रिल २०१७ रोजी या अभियानाची सुरूवात राज्यात झाली. त्यात राज्यातील दुर्गम भागातील २४८ गावात १४२ ग्रामदुतांच्या माध्यमातून ग्राम परिवर्तनाची चळवळ राबविण्यास प्रारंभ झाला. याच अभियानात धामणगाव बढे येथील सद्दाम खान या युवकाने कामाचा चांगला ठसा उमटवला. वाणिज्य शाखेचा स्नातक असलेल्या सद्दाम खाने पत्रकारितेचीही पदवी घेतली आहे. ‘जांभळी’ या गावातील नागरिकांना त्याने विकासाची वाट दाखवली. जांभळी ही गट ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या दोन हजार ८५७ असून गट ग्रामपंचायतीमध्ये जांभळी, चिंचोली, जांभळी वाडी व मेहरबान नाईक तांडा या दुर्गम गावांचा समावेश. गेल्या १९ वर्षापासून या गावात रेशनकार्ड नव्हते, वाहतुकिची व्यवस्था नसल्यामुळे मुले, मुली सातवीनंतर शिक्षणापासून वंचित राहत होती. वैद्यकीय सुविधांचा अभावामुळे नागरिक त्रस्त, पाणीटंचाई, विजेचा प्रश्न, सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव अशा अनेक समस्या येथे होत्या. या गावात ग्रामदुत म्हणून गेलेल्या सद्दाम खान याने प्रथम गावाचा अभ्यास केला. गावकरी, पदाधिकारी यांना विश्वासत घेत प्रशासनाच्या सहकार्याने गावात रेशनकार्ड दिले. विद्यार्थ्यांसाठी गावापर्यंत एसटी पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. टेलीमेडीसीनच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. जिल्हा परिषद शाळेमध्ये सोलर उर्जेद्वारे वीज आणली. गावात स्वच्छतेच्या दृष्टीने सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सध्या प्रगतीमध्ये आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नाद्वारे प्रशासनाच्या सहकार्यातून मोठा निधी त्याने गावाच्या विकासासाठी वळविला. त्यामुळे ग्रामस्थांचा सध्या तो जिवलग बनला आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनी ध्वज वंदन करण्याचा पहिला मान त्याला एैन निवडणुकीच्या काळात गावकर्यांनी दिला. इतकेच काय त्याला ग्रामस्थांनी मेसही लावू दिली नाही. दररोज गावातील एका कुटुंबाकडे तो आता जेवन करतो.

मुख्यमंत्र्यांनी चित्रफीत केली ट्विट 

ग्राम परिवर्तन मिशन तर्फे एकमेव जांभळी गावाची चित्रफीत बनविण्यात आली आहे. गावकरी आणि सद्दामचे काम यावर ती आधारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती रतन टाटा, प्रशासनातील बड्या अधिकार्यांनी ही चित्रफीत पाहली. आणि मुख्यमंत्र्यांनीही ती ट्विट केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना