शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा

By admin | Updated: March 27, 2017 02:52 IST

कधी देहूरोड रेल्वे स्थानकावर, तर कधी तळेगाव, पिंपरी आदी भागात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी दिसून आली,

पिंपरी : कधी देहूरोड रेल्वे स्थानकावर, तर कधी तळेगाव, पिंपरी आदी भागात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी दिसून आली, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून शहरात पसरू लागल्या आहेत. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ती पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुले पळविणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. नागरिकांमध्ये भीती पसरेल, अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित होत आहे. परंतु मूल पळविल्याचे एकही खात्रीलायक वृत्त माध्यमांतून प्रसारित झालेले नाही. काही दिवसांपूर्वी चिखली परिसरातून गायब झालेली तीन अल्पवयीन मुले मुंबई रेल्वे स्थानकात आढळून आली. ही मुले स्वत:च रेल्वेने मुंबईला गेली होती. त्यांना कोणीही फूस लावून अगर पळवून नेले नव्हते. १६ वर्षांखालील अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्याने बेपत्ता झाले, अशी पोलीस दप्तरी नोंद होत नाही. त्यांचे अपहरण झाले, अशीच नोंद पोलिसांकडे केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या अपहरणाच्या घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, हे निदर्शनास येते. अशा घटनांमध्ये वाढ याचाच अर्थ लहान मुलांना कोणीतरी पळवून नेत आहे, असा काढला जातो. प्रत्यक्षात अल्पवयीन मुले घरातून स्वत:हून निघून गेलेली असतात. नुकतीच एक घटना बालेवाडीतील क्रीडा संकुलात घडली. विद्यार्थी खेळाडंूसाठी उपलब्ध करून दिलेल्या वसतिगृहातून वेळोवेळी कोणाबरोबर तरी बाहेर गेलेल्या मुलीचे कायदेशीर कस्टडीतून अपहरण केले, अशा स्वरूपाचा गुन्हा  संबंधित तरुणाविरुद्ध दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)