शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘आरटीओ’ च्या कारवाईत १.६८ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:51 IST

या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. ‘आरटीओ’ च्या जाळ्यात ५७९ वाहने गेल्या वर्षभरात अडकली आहेत. जप्त केलेल्या वाहनांपैकी ८३ टक्के वाहनांची मुक्तता करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीचे अनेक नियम आहेत. या नियमांचे काही वाहनधारकांकडून काटेकोरपणे पालन केल्या जात नाही. अशा वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून नजर ठेवली जाते. वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनधारकांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. कर न भरणे, अवैध प्रवासी वाहतुक, विमा नसणे तथा ओव्हरलोड वाहनधारकांना दंड ठोठावण्यात येतो. दंडाची रक्कम न भरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येतात. जप्त करण्यात आलेले वाहन त्या त्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन किंवा एसटी डेपोमध्ये जमा करण्यात येते. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ५७९ वाहने जप्त करण्यात आली. यापैकी ४८६ वाहने मुक्त करण्यात आली आहेत. या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी अद्याप मुक्त न झालेली ९३ वाहने आहेत. याआधीदेखील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेली व मुक्त न झालेली बरीच वाहने आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हर्रासी न झाल्याने ही वाहने तशीच पडून आहेत. यामुळे पोलीस स्टेशन व एसटी डेपोमधील जागा नाहक अडकून पडत आहे. एवढेच नव्हे तर अनेक वाहने भंगारवस्थेत पडली असल्याचे दिसून येत आहे. भंगार वाहनांची संख्या वाढण्यापूर्वी या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी हर्रासी करणे अपेक्षित आहे.दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाहतुक नियम मोडणाºया वाहनधारकांना दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्या जाते. मुदतीत वाहने मुक्त न केल्यास ती वाहने पोलिस स्टेशन व एसटी डेपोच्या आवारात जमा ठेवण्यात येतात. या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी काही नियोजित कालावधीनंतर या सर्व वाहनांची हर्रासी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने अनेक वेळा हर्रासीला विलंब होत असल्याचे दिसून येते.दीड कोटींपेक्षा जास्त कराची वसुलीउपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या पथकाच्या वतीने २०१९ मध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कर न भरलेले अनेक वाहनधारक आढळून आले. रस्त्यावर पकडण्यात आलेल्या वाहनधारकांकडून १ कोटी ६५ लाख ६१ हजार रुपयांचा कर वसुल करण्यात आला. अद्यापही कर न भरलेल्यांनी प्राधान्यक्रमाने आपल्या वाहनांचा कर भरावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस