शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

शेतक-याला दोन लाखांची नुकसानभरपाई

By admin | Updated: August 28, 2015 00:17 IST

शॉर्टसर्किटने उसाला आग लागली होती; त्यामुळे दोन लाखांची नुकसानभरपाई देण्याचे महावितरण कंपनीला ग्राहक न्यायालयाचे आदेश.

बुलडाणा : महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील लोंबकळलेल्या तारांचे घर्षण झाल्याने उसाला आग लागून शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोटी-धानोरा येथील शेतकरी विक्रम पाटील यांना २ लाख २२ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने बुधवार, २६ ऑगस्ट रोजी दिला. धानोरा तालुक्यातील नांदुरा येथील शेतकरी विक्रम पाटील यांचे रसूलपूर शिवारात शेत आहे. या शेतात विक्रम पाटील यांनी ऊस लावला होता. त्यांच्या शेतात असलेल्या विद्युत डीबीच्या विजेच्या तारा लोंबकळत होत्या. यातील काही तारा उघड्या अवस्थेत होत्या. सदर डीबीला कुलूपसुद्धा लावलेले नव्हते. १७ मार्च २0१२ रोजी या उघड्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिगणी उडाली व उसाला आग लागला. यामध्ये विक्रम पाटील यांच्या साडेसात एकर शेतातील पीक जळून नष्ट झाले. या घटनेची तक्रार शेतकर्‍यांनी महावितरणला तसेच मलकापूर पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला; मात्र महावितरणच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचीही तसदी घेतली नव्हती. याप्रकरणी सदर शेतकर्‍याने सबळ पुराव्यासह जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागितली. अर्जदाराचा युक्तिवाद व दाखल केलेल्या सबळ पुराव्यावरून ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष विश्‍वनाथ ढवळे, सदस्य नंदा लारोकार, एम.बी. वानखेडे यांनी शे तकर्‍याच्या ऊस पिकाच्या नुकसानभरपाईपोटी २ लाख १0 हजार रुपये, त्यावर रक्कम देईपर्यंत नऊ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल सात हजार रुपये आणि कोर्ट खर्चापोटी पाच हजार रुपये असा २ लाख २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. शेतकरी विक्रम पाटील यांच्यातर्फे अँड. शरद राखोंडे यांनी काम पाहिले.