शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

दगडवाडी ग्रामस्थांचा बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: August 28, 2015 00:20 IST

शेतरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम दगडवाडी येथे ४५, ३६, ३२, ४0 क्रमांकाच्या गटातला रस्ता अडविण्यात आला आहे. तो रस्ता त्वरित मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी दगडवाडी ग्रामस्थांनी २७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. येथील पूर्वीचा शेतरस्ता ग्राम दगडवाडी येथील काही लोकांनी बळजबरीने अडविला आहे. त्यामुळे सदर गटक्रमांकातील शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. यामुळे शेतकर्‍यांच्या बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातच रस्त्यात मध्ये असलेल्या नदीला पूर आल्यानंतर पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागते. काही दिवसांपूर्वी नदीमधून रस्ता ओलांडताना एक महिला शेतकरी पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडली हो ती. सदरचा रस्ता त्वरित मोकळा करून देण्यासाठी १६ जुलै रोजी एसडीओ कार्यालय सिंदखेडराजा यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला होता तसेच न्याय न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारासुद्धा देण्यात आला होता. शासनाने दखल न घेतल्याने अखेर दगडवाडी ग्रामस्थांनी देऊळगावराजा तहसीलसमोर बैलगाडी मोर्चा काढून उपोषणास प्रारंभ केला आहे.