शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहणाशिवाय रस्त्याचे काम करू नये - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:06 IST

खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  

ठळक मुद्देबोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे पालकमंत्र्यांना निवेदनखामगाव-चिखली व चिखली-मेहकर मार्गाचे रुंदीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून  रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.  वस्तुत: सदर डांबरी रस्ता पूर्वी फक्त २0 फूट  रूंदीचा असताना आणि तेवढीच जमीन शेतकर्‍यांनी शासनास दिलेली असताना, सद्यस् िथतीत कुठलेही कायदेशीर अधिग्रहण न करता हा रस्ता रूंद केल्या जातो आहे. शिवाय या रस्त्याची बाहेरील प्रकल्पात येणारी जमीन शासन ताब्यात घेणार असल्याची  माहितीही मिळाल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.  सदर चुकीच्या व  बेकायदेशीर अधिग्रहणामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी फुकट हिरावल्या जात असल्याने हा  अन्याय होऊ नये त्यासाठी शासनाने कायदेशीर जमीन अधिग्रहीत करून शेतकर्‍यांना  त्याचा योग्य मोबदला द्यावा व नंतरच काम सुरू करावे, अन्यथा न्यायालयात कायदेशीर  मार्गाने लढाई लढावी लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  दरम्यान,  आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांची व्यथा शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून  देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पालकमंत्री ना.फुंडकर यांच्याशी चर्चा  करताना सदर प्रश्नी मंत्रालयात बैठक बोलाविण्याचा आग्रह धरण्याबरोबरच बैठकीत  संबंधित मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,  असा आग्रह आ.बोंद्रे यांनी धरला असता, पालकमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत  लवकरच मंत्रालयात बैठक लावण्याचे मान्य केले आहे. यावेळी  खंडाळा मकरध्वज,  मुंगसरी, भालगाव, खैरव, आमखेड, कोलारा, आंबाशी, वैरागड, उंद्री, अमडापूर,  टाकरखेड मुसलमान, कव्हळा, करणखेड, दहीगाव, उत्रादा, पेठ, बोरगाव वसु,  दिवठाणा, सोमठाणा, शिंदी हराळी, शेलुद आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.  

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरchikhali roadचिखली रोड