शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जमीन अधिग्रहणाशिवाय रस्त्याचे काम करू नये - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:06 IST

खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  

ठळक मुद्देबोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे पालकमंत्र्यांना निवेदनखामगाव-चिखली व चिखली-मेहकर मार्गाचे रुंदीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून  रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.  वस्तुत: सदर डांबरी रस्ता पूर्वी फक्त २0 फूट  रूंदीचा असताना आणि तेवढीच जमीन शेतकर्‍यांनी शासनास दिलेली असताना, सद्यस् िथतीत कुठलेही कायदेशीर अधिग्रहण न करता हा रस्ता रूंद केल्या जातो आहे. शिवाय या रस्त्याची बाहेरील प्रकल्पात येणारी जमीन शासन ताब्यात घेणार असल्याची  माहितीही मिळाल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.  सदर चुकीच्या व  बेकायदेशीर अधिग्रहणामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी फुकट हिरावल्या जात असल्याने हा  अन्याय होऊ नये त्यासाठी शासनाने कायदेशीर जमीन अधिग्रहीत करून शेतकर्‍यांना  त्याचा योग्य मोबदला द्यावा व नंतरच काम सुरू करावे, अन्यथा न्यायालयात कायदेशीर  मार्गाने लढाई लढावी लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  दरम्यान,  आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांची व्यथा शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून  देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पालकमंत्री ना.फुंडकर यांच्याशी चर्चा  करताना सदर प्रश्नी मंत्रालयात बैठक बोलाविण्याचा आग्रह धरण्याबरोबरच बैठकीत  संबंधित मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,  असा आग्रह आ.बोंद्रे यांनी धरला असता, पालकमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत  लवकरच मंत्रालयात बैठक लावण्याचे मान्य केले आहे. यावेळी  खंडाळा मकरध्वज,  मुंगसरी, भालगाव, खैरव, आमखेड, कोलारा, आंबाशी, वैरागड, उंद्री, अमडापूर,  टाकरखेड मुसलमान, कव्हळा, करणखेड, दहीगाव, उत्रादा, पेठ, बोरगाव वसु,  दिवठाणा, सोमठाणा, शिंदी हराळी, शेलुद आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.  

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरchikhali roadचिखली रोड