शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

नळगंगा नदी हरवते आहे !

By admin | Updated: April 16, 2015 00:41 IST

कधीकाळी मलकापूरातून स्वच्छ वाहणार्‍या नळगंगेला आले गटाराचे स्वरूप.

मनोज पाटील/ मलकापूर: कधीकाळी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहणारी.. पाण्यात उन्हाने चमचम चमकणारी वाळू..लयबध्द विहरणारे मासे-जलचर जिव..दोन्ही काठावर दाट पसरलेला वृक्षराज..वृक्षांवर कलकलणारे पक्षाचें थवे..अस मनाला प्रसन्न करणार नळगंगा नदीच अगदी देखण रुप. मात्र आज हे सार केवळ कल्पना विस्तारच होऊन बसलं आहे. मानवी चुका व दोषांमुळे नदीला पात्रच उरले नसल्याने मलकापूरातील नळगंगा आता हरवली असल्याचे दुदैवी चित्र स्पष्ट दिसत आहे. घाटावरुन मोताळा-दाताळा मार्गे मलकापूरच्या हद्दीत बोदवड पुलापासून गाडेगाव मंदीर-स्मशानभुमी, मंगलगेट, सालीपुरा, बारादरी, शिवाजी नगर, पारपेठ आदी परिसराला भेदत शहराच्या सिमेवरुन एकेकाळी खळखळून वाहणारी नळगंगा नदी म्हणजे नगरवासीयांची तृष्णा भागवणारी जिवनदायीनी, शहराचे सौदर्य फुलविणारी ही नळगंगा नदी आज केवळ नावालाच उरली आहे. या निर्सगनिर्मित यंत्रणेची मानवी यंत्रणेने काळजी न घेतल्यामुळे नैसर्गीक संपत्तीची ही देणगी काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे. नदीपात्राच्या हाकेच्या अंतरावरच मानवी वस्ती असून या वस्त्यांचा विस्तारही वाढलेला आहे. या वस्त्यांमधील नागरिकांना नेहमीच दुर्गंंधीयुक्त वातावरण व सरपटणर्‍या जिवांना सामोर जाव लागते. अशा समस्या येथे असून मानवी दोषांमुळे या नदीपात्राची वाट लागल आहे. बदलती परिस्थिती व मानवी चुकांमुळे नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. प्रवाहाला खिळ बसून बाधा निर्माण झाली आहे. रेती व माती उपशामुळे नदीपात्रात छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. वाळू व जलजीव नामशेष झाले आहेत. नदीचे पात्र कमी-कमी होत चालल्याने नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. नळगंगेचा हा कोंडलेला श्‍वास भविष्यात वेध घेत मोकळा करणे गरजेचे झाले आहे.