बुलडाणा : शेतकर्यांच्या घरात शेवटचा दाणा असेपयर्ंत शासन तूर खरेदी करणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांनी केली; मात्र आज शासन तूर खरेदी करत नाही, त्यामुळे २९ एप्रिल २0१७ ला संपूर्ण जिल्ह्याभर काँग्रेसच्यावतीने उठबशा आंदोलन करण्यात आले. शासन तूर खरेदी करत नाही म्हणून "विश्वास ठेवला चूक झाली" असे म्हणत शेतकर्यांना उठबशा घालायची वेळ आली आहे. २९ एप्रिल २0१७ ला संपूर्ण जिल्ह्यासह बुलडाणा तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. त्यांच्यासह शहर अध्यक्ष शरद राखोंडे, सुनील सपकाळ, रसूल खान, कौतिकराव पाटील, आरिफ खान, गजनफर खान, अँड. राज शेख, इरफान कुरेशी, रियाज ठेकेदार, सईद खान, अमानखान मुश्ताक सेठ, भागवत वानरे, प्रदीप डांगे, शैलेश खेडकर, सुरेश सरकटे, प्रदीप मोरे, चिंटू परसे, अनिल वारे, नंदकिशोर जाधव, संतोष पाटील, फरहान खान, सुरेश पाटील, दत्त गिरही, समाधान जाधव, भगवान भरड, रिझवान सौदागर, दत्ता काकस, अमीन खान, विनोद जाधव, सखाराम पाटील, काँग्रेस पदाधिकारी, आजी माजी जि.प., पं.स., न.प. सदस्य व सर्व सेलच्या अध्यक्ष, सदस्य व तूर उत्पादक शेतकर्यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
काँग्रेसचे जिल्हाभरात ‘उठबशा’ आंदोलन
By admin | Updated: April 30, 2017 02:39 IST