शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार; गुरांवर उपासमार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:37 IST

चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात दुष्काळाची तिव्रता वाढली असून, दुष्काळी भागात जनावरांसाठी आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यासाठी तालुका स्तरावर समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे. परंतू चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार, जनावरांवर उपासमार असे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच असून, पाण्यापाठोपाठ चाºयाचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुधन जगविणे शेतकºयांना अवघड झाले आहे.  जिल्ह्यामधील सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या भागातही अद्याप    चारा सुरू करण्यात आल्या नाहीत. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आदेश काढले अरहेत. तसेच जिल्हाधिकाºयांना चारा छावणी सुरू करण्यासाठीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात तुर्तास टंचाई नसल्याचे सांगुन चारा छावण्या सुरू करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. मात्र प्रामुख्याने मे अखरे जिल्ह्यात चाराटंचाईची स्थिती निर्माण होण्याची साधार भीती पाहता  जिल्हा पशुसंवर्धन विभागाने संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी आधीच उपरोक्त नियोजन करून ठेवले आहे.  यासंदर्भात ३१ जानेवारी रोजीच जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन त्यात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी संबंधीत विभागांना सुचना देऊन अनुषंगीक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये तालुकास्तरीय समितीचे तातडीने गठन करण्यात येऊन तालुका पशुधन विकास अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याबाबत निर्देशीत केल्या गेले आहे. सोबतच कृषी विभाग, ग्राम विकास अधिकारी, तलाठी यांनी आपसी समन्वय ठेवून चारा उपलब्धतेची माहिती गाव निहाय भेटी देऊन संकलीत करण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार आता मंडळ निहाय आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात एक लाख ११ हजार ७५७ मेट्रीक टन चाºयाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता दाखवून त्यानुषंगाने हे नियोजन दोन महिन्यापूर्वी सुरू होते. मात्र आतापर्यंत चारा टंचाईच्या अनुषंगाने तालुका स्तरावर नेमण्यात आलेल्या गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांच्या समितीकडून एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला नाही. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्यास होणारा विलंब गुरांसाठी उपासमारी व पशुपालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 

 असा लागतो दिवसाला चाराजिल्ह्यात लहान गुरांची संख्या ६४ हजार ४३७ असून मोठ्या गुरांची संख्या पाच लाख ९५ हजार ५४९ असून शेळी व मेंढी मिळून चार लाख १२ हजार ८४१ असे एूकण दहा लाख ७२ हजार ९२७ गुरे जिल्ह्यात आहेत. यामध्ये टंचाई काळात लहान  गुरांसाठी तीन किलो तर मोठ्या गुरांसाठी सहा किलो आणि शेळ््या मेंठ्यांसाठी ६०० ग्रॅम वाळलेला चारा प्रतिदीन लागतो. प्रस्तावित १८ छावण्यालाही मिळेना मुहूर्त जिल्ह्यातील ९० मंडळामध्ये टंचाईच्या दृष्टीकोणातून एकूण १८ चारा छावण्या उभारण्याचे प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यासाठी जवळपास दोन कोटी ५८ लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. परंतू मे महिना उजाडला असतानाही प्रस्तावित १८ चारा छावण्या सुरू करण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.  चारा चाछवण्या सुरू करण्याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही. चारा छावण्या सुरू करण्यासाठी तालुका स्तरावर समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीकडून जिल्ह्यात किती जनावरे आहेत, किती चारा उपलब्ध आहे, याचा सर्व आढावा घेऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात येतो. त्यानंतर चारा छावणी सुरू केल्या जाते. - डॉ. पी. जी. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा