शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार; गुरांवर उपासमार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:37 IST

चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात दुष्काळाची तिव्रता वाढली असून, दुष्काळी भागात जनावरांसाठी आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यासाठी तालुका स्तरावर समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे. परंतू चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार, जनावरांवर उपासमार असे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच असून, पाण्यापाठोपाठ चाºयाचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुधन जगविणे शेतकºयांना अवघड झाले आहे.  जिल्ह्यामधील सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या भागातही अद्याप    चारा सुरू करण्यात आल्या नाहीत. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आदेश काढले अरहेत. तसेच जिल्हाधिकाºयांना चारा छावणी सुरू करण्यासाठीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात तुर्तास टंचाई नसल्याचे सांगुन चारा छावण्या सुरू करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. मात्र प्रामुख्याने मे अखरे जिल्ह्यात चाराटंचाईची स्थिती निर्माण होण्याची साधार भीती पाहता  जिल्हा पशुसंवर्धन विभागाने संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी आधीच उपरोक्त नियोजन करून ठेवले आहे.  यासंदर्भात ३१ जानेवारी रोजीच जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन त्यात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी संबंधीत विभागांना सुचना देऊन अनुषंगीक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये तालुकास्तरीय समितीचे तातडीने गठन करण्यात येऊन तालुका पशुधन विकास अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याबाबत निर्देशीत केल्या गेले आहे. सोबतच कृषी विभाग, ग्राम विकास अधिकारी, तलाठी यांनी आपसी समन्वय ठेवून चारा उपलब्धतेची माहिती गाव निहाय भेटी देऊन संकलीत करण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार आता मंडळ निहाय आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात एक लाख ११ हजार ७५७ मेट्रीक टन चाºयाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता दाखवून त्यानुषंगाने हे नियोजन दोन महिन्यापूर्वी सुरू होते. मात्र आतापर्यंत चारा टंचाईच्या अनुषंगाने तालुका स्तरावर नेमण्यात आलेल्या गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांच्या समितीकडून एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला नाही. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्यास होणारा विलंब गुरांसाठी उपासमारी व पशुपालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 

 असा लागतो दिवसाला चाराजिल्ह्यात लहान गुरांची संख्या ६४ हजार ४३७ असून मोठ्या गुरांची संख्या पाच लाख ९५ हजार ५४९ असून शेळी व मेंढी मिळून चार लाख १२ हजार ८४१ असे एूकण दहा लाख ७२ हजार ९२७ गुरे जिल्ह्यात आहेत. यामध्ये टंचाई काळात लहान  गुरांसाठी तीन किलो तर मोठ्या गुरांसाठी सहा किलो आणि शेळ््या मेंठ्यांसाठी ६०० ग्रॅम वाळलेला चारा प्रतिदीन लागतो. प्रस्तावित १८ छावण्यालाही मिळेना मुहूर्त जिल्ह्यातील ९० मंडळामध्ये टंचाईच्या दृष्टीकोणातून एकूण १८ चारा छावण्या उभारण्याचे प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यासाठी जवळपास दोन कोटी ५८ लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. परंतू मे महिना उजाडला असतानाही प्रस्तावित १८ चारा छावण्या सुरू करण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.  चारा चाछवण्या सुरू करण्याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही. चारा छावण्या सुरू करण्यासाठी तालुका स्तरावर समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीकडून जिल्ह्यात किती जनावरे आहेत, किती चारा उपलब्ध आहे, याचा सर्व आढावा घेऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात येतो. त्यानंतर चारा छावणी सुरू केल्या जाते. - डॉ. पी. जी. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा