शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

जलाशयांनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 02:26 IST

मोठे, मध्यम व लघू प्रकल्प : सरासरी ९.४0 टक्के जलसाठा शिल्लक.

बुलडाणा : मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यंदाही जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस आला; मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे आज रोजी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या जिल्ह्याखालील ९१ जलाशयात केवळ 0९.४0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास सर्वच जलाशयांनी तळ गाठला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यावर जलसंकट उभे ठाकले आहे. तीन मोठे प्रकल्प आणि सात मध्यम आणि ७४ लघू प्रकल्पात या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी वर्षभर या प्रकल्पामधून पाणी वापरण्यात येते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला भरलेली ही जलाशये मार्चपर्यत तळ गाठते. शिवाय मार्च अखेरपासून तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे जलपातळीत कमालीची घट आढळून आली आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठे प्रकल्पात सरासरी १0.२८ टक्के, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या मध्यम प्रकल्पात सरासरी 0४.९0 टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ७४ लघू प्रकल्पामध्ये केवळ 0५.६९ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खर्‍या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने लोकवस्तीत पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. परिणामी लघु प्रकल्प आटल्यामुळे नागरिकांस वनप्राण्यांनाही याचा फटका जणवत आहे. मोठे व माध्य. प्रकल्पात मोठय़ा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, धरणातील जलस्तर घटल्याने येत्या उन्हाळ्याच्या तीन महिन्यात जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात पाणीबाणी आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.