शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जलाशयांनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 02:26 IST

मोठे, मध्यम व लघू प्रकल्प : सरासरी ९.४0 टक्के जलसाठा शिल्लक.

बुलडाणा : मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यंदाही जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस आला; मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे आज रोजी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या जिल्ह्याखालील ९१ जलाशयात केवळ 0९.४0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास सर्वच जलाशयांनी तळ गाठला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यावर जलसंकट उभे ठाकले आहे. तीन मोठे प्रकल्प आणि सात मध्यम आणि ७४ लघू प्रकल्पात या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी वर्षभर या प्रकल्पामधून पाणी वापरण्यात येते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला भरलेली ही जलाशये मार्चपर्यत तळ गाठते. शिवाय मार्च अखेरपासून तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे जलपातळीत कमालीची घट आढळून आली आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठे प्रकल्पात सरासरी १0.२८ टक्के, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या मध्यम प्रकल्पात सरासरी 0४.९0 टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ७४ लघू प्रकल्पामध्ये केवळ 0५.६९ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खर्‍या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने लोकवस्तीत पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. परिणामी लघु प्रकल्प आटल्यामुळे नागरिकांस वनप्राण्यांनाही याचा फटका जणवत आहे. मोठे व माध्य. प्रकल्पात मोठय़ा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, धरणातील जलस्तर घटल्याने येत्या उन्हाळ्याच्या तीन महिन्यात जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात पाणीबाणी आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.