शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जलाशयांनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 02:26 IST

मोठे, मध्यम व लघू प्रकल्प : सरासरी ९.४0 टक्के जलसाठा शिल्लक.

बुलडाणा : मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यंदाही जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस आला; मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे आज रोजी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या जिल्ह्याखालील ९१ जलाशयात केवळ 0९.४0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास सर्वच जलाशयांनी तळ गाठला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यावर जलसंकट उभे ठाकले आहे. तीन मोठे प्रकल्प आणि सात मध्यम आणि ७४ लघू प्रकल्पात या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी वर्षभर या प्रकल्पामधून पाणी वापरण्यात येते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला भरलेली ही जलाशये मार्चपर्यत तळ गाठते. शिवाय मार्च अखेरपासून तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे जलपातळीत कमालीची घट आढळून आली आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठे प्रकल्पात सरासरी १0.२८ टक्के, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या मध्यम प्रकल्पात सरासरी 0४.९0 टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ७४ लघू प्रकल्पामध्ये केवळ 0५.६९ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खर्‍या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने लोकवस्तीत पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. परिणामी लघु प्रकल्प आटल्यामुळे नागरिकांस वनप्राण्यांनाही याचा फटका जणवत आहे. मोठे व माध्य. प्रकल्पात मोठय़ा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, धरणातील जलस्तर घटल्याने येत्या उन्हाळ्याच्या तीन महिन्यात जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात पाणीबाणी आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.