शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

धरणांमधील जलसाठय़ात वाढ!

By admin | Updated: September 29, 2016 01:38 IST

नळगंगा, पेनटाकळी, खडकपुर्णा या मोठय़ा प्रकल्पामधील जलपातळीत वाढ झाली आहे.

बुलडाणा, दि. २८- शहरासह परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर येवून नळगंगा, पेनटाकळी, खडकपुर्णा या मोठय़ा प्रकल्पामधील जलपातळीत वाढ झाली आहे. योबतच मध्यम प्रकल्प असलेले येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे भविष्यातील दोन वर्षाची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांना येळगाव धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. मागिल काही वर्षापासून कमी पावसामुळे येळगाव धरणात अल्प जलसाठा येत होता. त्यामुळे बुलडाणा शहरासह इतर गावांना उन्हाळ्यात तिव्र पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. बुलडाणा शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेव्दारे ८0 हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुध्दीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभातून शहर परिसरात दुसर्‍या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागिल वर्षापासून परिस्थिती बदलली होती. मागिल वर्षी झालेल्या पावसामुळे धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आजही शहरात एका दिवसाआड पाणी मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. मात्र येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून येळगाव धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा होणे आवश्यक होते. दरम्यान शुक्रवारी रात्री, शनिवारी, बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नाल्यांना पूर आला. देऊळघाट येथून वाहणार्‍या पैनगंगा नदीला पूर आला. त्यामुळे येळगाव धरणात १२.४0 द.ल.घ.मी. म्हणजे १00 टक्के जलसाठा आला व आता धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे येळगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. धरण १00 टक्के भरल्यामुळे येणार्‍या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसून बुलडाणासह परिसरातील गावांची चिंता मिटली आहे. दोन दिवसाच्या दमदार पावसाचा परिणामबुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 द. ल. घ. मी. आहे. मागिल वर्षी पावसाळ्यात धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. पावसाळ्यापूर्वी धरणात 0.९0 द.ल.घ.मी. जलसाठा होता. मात्र शुक्रवार व शनिवार रात्रीसह आतापर्यंंत झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पुन्हा १२.४0 द.ल.घ.मी जलसाठा आला आला आहे.