शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

५० फूट विहिरीत पडलेल्या अस्वलाला दिले जीवनदान; देव्हारी गावाजवळील घटना 

By संदीप वानखेडे | Updated: May 25, 2024 16:07 IST

तब्बल १० तास सुरू हाेते बचाव अभियान.

संदीप वानखडे, बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत एक अस्वल २४ मे राेजी सायंकाळी पडले. १० तासांच्या बचाव अभियानानंतर या अस्वलाला बाहेर काढण्यात आरएफओ चेतन राठोड व त्यांच्या पथकाला यश मिळाले.

अस्वलासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य मोठ्या प्रमाणात अस्वलांचे अधिवास आहे. या अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ एका शेतातील कठडे नसलेल्या ५० फूट खोल विहिरीत अस्वल पडले होते. ही बाब काल शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन्यजीव विभागाला माहिती दिली. वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. परंतु, तोपर्यंत अंधार झाला होता. विहिरीत जवळपास १० फूट पाणी असल्याने अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे आरएफओ चेतन राठोड यांनी अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.

बचाव पथकाला करावी लागली कसरत-

विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. परंतु, अस्वलाने पाइप फोडून टाकले. त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला; पण अस्वल हुलकावणी देत होते. लाकडी शिडी तयार करून ती विहिरीत टाकली तरीही अस्वल बाहेर येत नव्हते. शेवटी दोरीची शिडी विहिरीत टाकण्यात आली आणि त्याच्या मदतीने शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अस्वल विहिरीतून सुखरूप बाहेर निघून जंगलाच्या दिशेने पळून गेले.

ही बचाव माेहीम आरएफओ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपाल संजय राठोड, वनपाल समाधान मांटे, रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, अमोल चव्हाण, वन्यजीव विभागाचे नीतेश गवई, राजेंद्र सूर्यवंशी, प्रवीण भांडे, समाधान गुगळे, गोरक्षसनाथ जगताप, संजीवनी खारोडे यांच्यासह वनमजूर यांनी पार पाडली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा