शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे नमुन्यांचा अहवाल गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:18 IST

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी बियाण्यांचे हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले; मात्र आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला असून १३७ नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाला नाही.

ठळक मुद्देकृषी विभागाने खरीप हंगामाच्या १५ दिवसांपूर्वीच विविध बियाण्यांचे १७५ नमुने घेतले होते.आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला असून १३७ नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाला नाही. पेरणीला वेग आलेला असतानाही बियाण्यांच्या नमुन्याचा अहवाल गुलदस्त्यातच आहे.

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : गतवर्षीसारखी पिकांवर किडीची समस्या उद्भवू नये, यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाच्या १५ दिवसांपूर्वीच विविध बियाण्यांचे १७५ नमुने घेतले होते. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी बियाण्यांचे हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले; मात्र आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला असून १३७ नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाला नाही. पेरणीला वेग आलेला असतानाही बियाण्यांच्या नमुन्याचा अहवाल गुलदस्त्यातच आहे.गेल्यावर्षी कपाशीसह इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. बोंडअळीचा जिल्ह्यातील १ लाख ९० हजार हेक्टरवर फटका बसला होता. यासाठी काहीप्रमाणात बियाणे व हलक्या दर्जाची कीटकनाशके कारणीभूत होती. यावर्षी ही समस्या उद्भवू नये, यासाठी बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांची गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक असल्याने कृषी विभागाने उन्हाळ्यातच जिल्ह्यात कृषी केंद्राची तपासणी मोहीम हाती घेतली होती. बियाणे, खत, किंवा कीटकनाशकांच्या बाबतीत फसवणूक झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन विस्कळीत होते. त्यामुळे बियाणे कंपन्या आणि कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कृषी विभागाला करावे लागते. त्यामुळे यावर्षी खरीपाच्या सुरूवातीला २६८ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी कृषी साहित्यांची विक्री करताना स्टॉक रजिस्टर, विक्री बुक, दरपत्रक ठेवण्यापासून अनेक प्रकारच्या नियमावलींची अंमलबजावणीची पाहणी केली. यासोबतच कृषी विभागाकडून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर व इतर बियाण्यांचे नमुने घेतले होते. जिल्ह्यातून बियाण्यांचे १७५ नमुने घेतल्यानंतर ते नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. सध्या खरीपाच्या पेरणीला वेग आला असून बियाणे नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त होत नसल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रFarmerशेतकरी