शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भूकबळी प्रकरणात प्रधान सचिवांना अहवाल सादर; चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:26 IST

बुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे. दरम्यान, या मध्ये चार अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.प्रधान सचिवांकडून या प्रकरणी जिल्हा प्रशासनास उलट टपाली कुठलाही पत्रव्यवहार अथवा सुचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र प्रकरणात मोताळा तहसिल कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकार्यांची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत असून निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून (पुरवठा), कार्ड लिपीक अशा चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सोबतच कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्यासाठी त्यांना मर्यादीत कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधितांची चौकशीही सुरू असून कारणे दाखवा नोटीसला मिळालेल्या उत्तरानंतर या प्रकरणात नेमके दोषी कोण हे ठरविण्यात येऊन पुढील कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.जयपूर येथील गोविंदा गवई (६५) या वृद्धाचा २१ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. २२ सप्टेंबर रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. प्रकरणी धान्य न मिळाल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत व्यक्तीच्या पत्नीने तहसिल कार्यालयाकडे २८ सप्टेंबर रोजी केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनीही या प्रकरणात २८ आॅक्टोबर रोजी मोताळा तहसिल कार्यालय गाठून प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेत २९ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष जयपूर येथील मृत व्यक्तीच्या घरी भेट देऊन पाहणी केली होती तर परिसरातील नागरिकांशीही या प्रकरणात चर्चा केली होती. त्यानंतर २९ सप्टेंबरला सायंकाळी ७ ते आठ वाजे दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आणि वास्तव माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली होती. प्रकरणात रेशन दुकानदाराचा परवाना आधीच निलंबीत करण्यात आला आहे. मात्र प्रथम दर्शनी हा मृत्यू भूकबळी असल्याचा जिल्हा प्रशासनाने नाकारले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी