शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी वनग्रामचे पुनर्वसन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:19 IST

Buldhana News एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी गावाच्या पूनर्वसनासंदर्भात हालचाली झालेल्या नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: टी-१ सी-१ वाघामुळे चर्चेत आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी वनग्रामचे पुनर्वसन रखडले आहे. त्यातच गावाचे सर्वेक्षण होऊन सेक्शन ११ लावण्यात आले आहे. यास एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी गावाच्या पूनर्वसनासंदर्भात हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे या गावात कुठलीही विकास कामेही करता येत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ९ डिसेंबर रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी केली. विशेष म्हणजे या गावातील २० लाभार्थी हे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र असतानाही सेक्सन ११ लागू केल्याने या योजनेचा लाभ मिळण्यात लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत. सोबतच गावात कुठलीही विकास कामे करता येत नाहीत. त्यामुळे एकतर गावाचे पुनर्वसन करा किंवा गावातील विकास कामे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील एक निवेदनही या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनास दिले आहे. आम्रपाली हिवाळे, साधना हिवाळे , वंदना झिने, शशिकांत हिवाळे, श्रीकृष्ण हिवाळे, प्रशांत गवई, मिलिंद हिवाळे, नितेश जाधव, नितीन पवार यांच्यासह जवळपास ३५ जणांनी ही मागणी केली.

२९८ कुटुंबाचे पुनर्वसन गरजेचेदेव्हारी गावात गेल्या वर्षी सर्वेक्षणादरम्यान २९८ कुटंब असल्याचे स्पष्ट झाले होते. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी ५७ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे; पण कोरोना संसर्गामुळे तथा अन्य प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे अनुषंगिक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे प्रलंबित पुनर्वसन व सेक्शन ११ लागू झाल्याने विकास कामांना मज्जाव अशा दुहेरी कात्रीत येथील ग्रामस्थ अडकलेले आहेत.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा