शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

‘लाल दिव्या’चे पहिले मानधन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला

By admin | Updated: September 9, 2015 01:53 IST

वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांचे पाऊल; शेतक-यांना दिलासा.

बुलडाणा : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा दु:खी, कष्टी आहे. भयंकर संकटामुळे खचून गेलेले शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. शेतकर्‍यांनी स्वत:ला सावरून आपल्या लेकरांना उघड्यावर टाकून आत्महत्या करू नये, याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांना मिळालेले पहिले मानधनही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सर्मपित केले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर १६ मे २0१५ रोजी मुंबईवरून येत असताना चिखला येथे कर्जबाजारी झालेल्या मोहन त्र्यंबक वाघ या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची माहिती तुपकरांना समजली. त्याचवेळी त्यांनी वाघ कुटुंबाचे सांत्वन करून आपल्याला मिळणारे पहिले मानधन वाघ कुटुंबियांना देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पहिले मानधन मृत शेतकर्‍याची पत्नी राधाबाई वाघ यांच्या पदरात टाकून तुपकर यांनी पूर्ण केला. तसेच सारोळापीर येथे मधुकर रामधन बावस्कर व दुधा येथील उत्तम सोनुने या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनायक वाघ, युवा जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत, विद्यार्थी संघटनेचे चंद्रशेखर चंदन, ज्येष्ठ नेते सतीश उबाळे, कडुबा मोरे, दिलीप निकम उपस्थित होते. ना. तुपकर यांनी चिखला, दुधा, घाटनांद्रा, माळवंडी, केसापूर, भादोला व वाडी येथे दुष्काळी भागात शेतकरी व गावकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, अशी विनंती ना.तुपकर यांनी यावेळी केली.