शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आठ महिन्यापासून विद्यूत सहायक पदाची भरती प्रक्रिया रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 15:00 IST

विद्यूत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची भरती होवू शकली नसल्याने महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: महावितरण व शासनाच्या निष्काळजीपणामुळे आठ महिन्यापूर्वी जाहिरात काढलेल्या विद्यूत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची भरती होवू शकली नसल्याने महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकामध्ये संतापाची लाट पसरली आहे.महाराष्ट्र शासनाने १३ जुलैरोजी महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक ५ हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार अशा एकूण ७ हजार पात्र उमेदवारांच्या अर्ज बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले व सदरची भरती ही जाहिरात निघाल्यापासून ४५ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे उर्जा मंत्र्यांचे आदेश होते.या सर्व प्रक्रियेला तब्बल सात ते आठ महिने होऊन देखील भरती प्रक्रिया शासनाच्या व महावितरणच्या निष्काळजी व दिरंगाईमुळे आज पर्यंत पूर्ण केलेली नाही. भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अर्जदारांमध्ये संतापाची लाट असून लाखो विद्यार्थ्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. आयटीआयधारकांच्या हाताला काम नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निघून जात आहे. भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने मुंबईत महावितरणच्या ‘प्रकाशगड’ कार्यालयासमोर ४ मार्चपासून ठिय्या देणार आहेत.त्यामुळे ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करून भरतीला प्राधान्य द्यावे. सोबतच बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण