शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

पर्यावरणाचे जतन हीच खरी भक्ती -आचार्य वेरुळकर गुरुजी

By admin | Updated: June 9, 2015 00:26 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदीवासी गावात नानाविध बियांचे रोपण.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): दगडाच्या देवाला पाणी घालण्यात काही अर्थ नाही. यज्ञकुंडात आहुती टाकल्याने पुण्य मिळते किंवा नाही, हे मला माहीत नाही. आपली परंपरा वृक्षाला देवता मानते. झाडे जगाला, प्राणवायू देतात. २४ तास ऑक्सिजन देणारी झाडे पर्यावरणात आहे. म्हणून पर्यावरणाचे जतन करा, त्यातच खरी भक्ती आहे, असे प्रतिपादन गुरुदेव सेवा मंडळाचे आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी केले.आज ८ जून रोजी सातपुड्याच्या पायथ्याशी वडपाणी या आदिवासी गावामध्ये संवाद साधताना बोलत ते होते. पर्यावरण ग्रुप जळगाव जामोदच्या वतीने पर्यावरण वाचविण्यासाठी बीजारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी पहिले बीजारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ आचार्य वेरुळकार गुरुजींनी केला. त्यानंतर येथील उजाड टेकड्यावर ५00 खड्डय़ांमध्ये जवळपास २ हजार बियांचे रोपण सर्वांंनी केली. खड्डय़ात सेंद्रिय खत, त्यावर बीज ठेवून मातीने झाकण्यात आले. पहिल्या पावसानंतर नैसर्गिकरित्या ही बीजे अंकुरणार आहे. त्याचबरोबर गावकर्‍यांनी संवाद साधताना त्यांनी या रोपांचे जतन करण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉ. स्वाती वाकेकर, लताताई तायडे, अनिताताई मिश्रा, पुष्पाताई कळसकार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, सचिन देशमुख, ठाणेदार एम.एस. भोगे, केशवदादा तेल्हारकर, वडपाणी गावाचे सरपंच ग्यानसिंग पर्यावरण ग्रुपचे सुनील भगत, जयदेव वानखडे, भीमराव पाटील, प्रा. श्याम फरफट, पंकज अग्रवाल, अजिंक्य टापरे, समाधान नानकदे, प्रा. अतुल ढोकणे, चतुर्भुज केला, शरद जाधव, डॉ. संदीप देशमुख, प्रा. राठोड, नीलेश राजूरकर, दीपक जाधव, यांच्यासह पर्यावरण मित्रांची उपस्थिती होती.