शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बैलांच्या नांगरटी झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST

धामणगांव धाड : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे ...

धामणगांव धाड : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे उन्हाळी नांगरटी. सध्या या नांगरटी अंतिम टप्प्यात आल्या असून, रोहिणी व मृग नक्षत्राच्या दृष्टीने शेतीच्या मशागती उरकल्या जात आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत.

बैलांच्या नांगरटीला होते महत्त्व

एकेकाळी शेती, शेतकरी अन् बैल हे नाते अतूट होते. ज्याच्याकडे जास्त बैल तो शेतकरी श्रीमंत मानला जायचा. थंडी कमी झाली की ज्वारी, गहू, हरभरा, सुगी संपताच सर्वत्र जमिनीच्या नांगरटी सुरू व्हायच्या. हे काम कष्टप्राय असल्याने जमीन मालक इतर शेतकऱ्यांना नांगरणीसाठी आमंत्रण देत असत. याला 'इरजीक' म्हणत. यासाठी अनेक शेतकरी बैलजोडी घेऊन नांगरणी करीत व सायंकाळी त्याच शेतात जेवणाचा आस्वाद घेतला जाई. एकमेकांच्या शेतीकामात मदत करीत कामे पूर्ण केली जायची. बैलाच्या नांगरणीमुळे जमीन तुडवली जात नाही. शिवाय शेताच्या बांधापर्यंत मशागत होते. या नांगरामागे फिरणारे पक्षी जमिनीतील विषारी जीवाणू खातात. अशा अनेक गोष्टींमुळे बैल शेतीला फार महत्त्वाचे होते. मात्र, आता बैल शेती दुर्मीळ होत आहे.