शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:33 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले.

बुलडाणा: केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून या विरोधात राज्य शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जोरदार हरकत नोंदवावी. हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना बाजारात मिळत आहे. त्याचा फरक थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.स्वाभीमानी शेतकरी संघटनेची पुनर्रचना आणि पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर, दामू अण्णा इंगोले, बबन चेके, घनश्याम चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर टाले, राणा चंदन, नंदीनी कल्याणकर उपस्थित होते. तूरीचा हमी भाव व बाजार भावात जवळपास १,५०० रुपयांचा फरक आहे. शेतकºयाला सरासरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने ही फरकाची रक्कम शेतकºयाच्या खात्यात जमा केली जावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. संघटनात्मक फेरबदलाचीही त्यांनी माहिती दिली. शिर्डी येथे २२ फेब्रुवारी रोजी संघटनेची बैठक होत असून त्यात राज्य कार्यकारीणी निवडण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. बैठकीत घाटावरील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. ज्ञानेश्वर टाले तर स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव चेके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख रफीक शे. करीम, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवनकुमार यांची निवड करण्यात आली. घाटाखालील संघटना अध्यक्ष म्हणून श्याम अवथळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून अनंता मानकर यांची निवड करण्यात आली. तर भगवान मोरे यांची राज्य कार्यकारीणीवर वर्णी लागणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीbuldhanaबुलडाणा