शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:33 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले.

बुलडाणा: केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून या विरोधात राज्य शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जोरदार हरकत नोंदवावी. हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना बाजारात मिळत आहे. त्याचा फरक थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.स्वाभीमानी शेतकरी संघटनेची पुनर्रचना आणि पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर, दामू अण्णा इंगोले, बबन चेके, घनश्याम चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर टाले, राणा चंदन, नंदीनी कल्याणकर उपस्थित होते. तूरीचा हमी भाव व बाजार भावात जवळपास १,५०० रुपयांचा फरक आहे. शेतकºयाला सरासरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने ही फरकाची रक्कम शेतकºयाच्या खात्यात जमा केली जावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. संघटनात्मक फेरबदलाचीही त्यांनी माहिती दिली. शिर्डी येथे २२ फेब्रुवारी रोजी संघटनेची बैठक होत असून त्यात राज्य कार्यकारीणी निवडण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. बैठकीत घाटावरील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. ज्ञानेश्वर टाले तर स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव चेके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख रफीक शे. करीम, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवनकुमार यांची निवड करण्यात आली. घाटाखालील संघटना अध्यक्ष म्हणून श्याम अवथळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून अनंता मानकर यांची निवड करण्यात आली. तर भगवान मोरे यांची राज्य कार्यकारीणीवर वर्णी लागणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीbuldhanaबुलडाणा