शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजपूत समाज न्यायाच्या अपेक्षेत - सानंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:53 IST

देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची  जगात ओळख आहे. राज्य, धर्म  वाचविणारा हा क्षत्रिय समाज  स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या  समाजाच्या त्यागाचा,  बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान  करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी  आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कोलारा येथे आयोजित  समस्त राजपूत समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात केली.

ठळक मुद्देकोलारा येथे पार पडला समस्त राजपूत समाजबांधवांचा मेळावा आरक्षणासाठी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची  जगात ओळख आहे. राज्य, धर्म  वाचविणारा हा क्षत्रिय समाज  स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या  समाजाच्या त्यागाचा,  बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान  करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी  आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कोलारा येथे आयोजित  समस्त राजपूत समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात केली.तालुक्यातील कोलारा येथे २७ ऑगस्ट रोजी समस्त राजपूत  समाजबांधवांचा भव्य मेळावा o्री सिद्धेश्‍वर महाराज संस्थानमध्ये  आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस् थानावरून राणा दिलीपकुमार सानंदा बोलत होते. यावेळी समजाचे  ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत, महाराणा प्रताप पुतळा समितीचे  अध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, राजपूत महासंघाचे संस्थापक  सुभाषसिंह राजपूत, शंकरराव सोळंकी, साहेबराव सोळंकी, बाजार  समितीचे उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, जि.प. सदस्य शरद हाडे,  पं.स. सदस्य मनीषा सपकाळ, अशोक सुरडकर, डॉ. प्रताप परिहार,  राम जाधव, संध्या राजपूत, योगेंद्र कटारिया, पंकजसिंह ठाकूर,  भारती शिसोदिया, जितेंद्र सूर्यवंशी, अजयसिंग सैगर, संजयसिंह  नाईक, संतोष पवार, डॉ. संजयसिंह कच्छवे, राजेंद्रसिंह राजपूत,  योगेंद्र राजपूत, सोनाली ठाकूर, बाबा ठाकूर, सुखदेवसिंह राजपूत,  आनंद ठोके यांच्यासह अ.भा. क्षत्रिय महासभा, महाराणा ब्रिगेड,  महाराणा क्रांती दल, राजपूत महासंघ, राजपूत युवा मंच आदी  विविध संघटनांचे पदाधिकारी होते. यावेळी पुढे बोलताना राणा  दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी  व भूमीसाठी रक्त सांडले आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ९  टक्के राजपूत समाज आहे. असे असताना या राज्यात आजही न्याय  मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत संकटाला संधी समजून काम  करू, तरच वास्तववादी राजपूत निर्माण होतील. आरक्षणाविनाही  राजपूत समाजाचे अनेक तरुण मोठय़ा हुद्यावर आहेत. जर आरक्षण  मिळाले तर समाजातील विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षेत्रात चांगले स्थान  मिळविता येईल, असा आशावाद व्यक्त करीत लवकर ना. रावळ  यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावणार  असून, आरक्षणासाठी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार  असल्याचेही सानंदा यांनी आर्वजून सांगितले. यावेळी बोलताना डॉ. संजयसिंग कच्छवे यांनी राजपूत समाज हा  सर्वधर्म समभाव जपत असून, एकमेकांना मदत करणारा समाज  असल्याचे स्पष्ट करीत समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जाचक  अटी काढण्यात येऊन भामटा हा शब्द न लावता सरसकट आरक्षण  मिळावे, अशी मागणी केली. राजपूत समाजाच्या जातीच्या दा खल्याचा प्रश्न जटिल बनला असून, तो सुकर करण्यासाठी  शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा  आरक्षण महामोर्चाचे अजयसिंग सेंगर यांनी व्यक्त केली. तर डॉ. प्र तापसिंह राजपूत यांनी समाजाच्यावतीने सरकारसोबत  आरक्षणासंदर्भाने कायदेशीर लढा सुरू असल्याचे सांगून राजपूत  भामटा, भामटी, परदेशी राजपूत या सर्व पोटजाती एकच आहेत.  तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी यांच्या  कार्यकाळामध्ये  समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले; परंतु  आरक्षणाचा प्रश्न इंग्रजकालीन वसाहतीच्या नोंदी सोलापूर आणि  पुणे जिल्हय़ातच आढळल्या; मात्र इतर जिल्हय़ात राजपूत  समाजाच्या अस्तित्वाच्या नोंदी नसणे ही चूक प्रशासनाची आहे.  त्याची शिक्षा समाजाला देण्यात येऊ नये व रक्ताचे नाते असल्यास  ब्लड रिलेशननुसार बापाला असेल तर मुलाला व्हॅलीडीटीची गरज  पडू नये व सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी डॉ. राजपू त यांनी केली. -