शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी...तुषार सिंचन सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

चिखली : जून महिना संपत आला असतानाही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या ...

चिखली : जून महिना संपत आला असतानाही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. काही भागांत पेरणी योग्य पाऊस झालेला असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्यात; मात्र, आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने नुकतेच अंकुरलेली पिके करपू लागली आहेत. पावसाने आणखी विलंब लावल्यास पेरणी झालेल्या ४२ टक्के क्षेत्रावरील पिकांचे ९० टक्के नुकसान अटळ असल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार संचाव्दारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू झाली आहे.

यामध्ये कोरडवाहू क्षेत्र उद्ध्वस्तीच्या मार्गावर असल्याने सर्वत्र चिंतेचे मळभ दाटून आले आहे. मृगात पेरणी केल्यानंतर पीक चांगले येते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुषंगाने यंदा मान्सूनपूर्व पाऊस पडताच खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे व खत खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली होती. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सुमारे ४२ टक्के क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, आता पावसाने डोळे वटारल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. हंगामाच्या सुरुवातीला हमखास पाऊस येणारच असे भाकीत हवामान खात्याच्या व इतर मान्सूनविषयक अभ्यासकांमधून व्यक्त केल्या जात होती. मात्र, ही भाकिते फोल ठरली आहेत. या भाकितांमुळे अनेक शेतकऱ्यांनी गडबड करत सोयाबीनची पेरणी उरकली आहे. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला व पेरण्या झाल्या, त्या भागास आता पावसाची नितांत गरज आहे. पावसाअभावी नुकतेच अंकुरलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पेरणीपश्चात पाऊस गायब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी तुषार संचाद्वारे सिंचन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्र संकटात सापडले आहे. नव्या आशेची पेरणी केली. मात्र, आता पावसाअभावी हे स्वप्नच करपू लागल्याने शेतकरी पुरता हादरला असून पेरणी झालेल्या व पेरणीसाठी आसुसलेल्या तालुक्यातील एकूण शेतीक्षेत्राला पावसाची नितांत गरज आहे.

३७ हजार १६७ हेक्टरावरील पिके धोक्यात

चिखली तालुक्यात एकूण लागवडीचे क्षेत्र ८८ हजार ४२३ हेक्टर आहे. यापैकी ३७ हजार १६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यामध्ये २८ हजार ९९५ हेक्टर सोयाबीन, ३ हजार ५२२ हेक्टर तूर, १ हजार ४३६ हेक्टर मूग, १ हजार ८६१ हेक्टर उडीद, १ हजार २०७ हेक्टर कापूस, १२ हेक्टर ज्वारी, ६ हेक्टर बाजरी, ७१ हेक्टर मका, ३५ हेक्टर भूईमूग, २ हेक्टर तीळ व २० हेक्टरावर इतर कडधान्य पिकांची पेरणी झालेली आहे.

५१ हजार २५६ हेक्टरावरील पेरण्या रखडल्यात

अमडापूर, उंद्री आणि एकलारावगळता उर्वरीत ८ मंडळात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यातील २३ दिवसांच्या कालावधीत केवळ ७ ते ८ दिवस भाग बदलून पाऊस झाला. एकदाही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने अद्यापही तालुक्यातील ५१ हजार २५६ हेक्टरावरील पेरण्या रखडलेल्या आहेत.