शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कपाशीला फटका! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:40 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. 

ठळक मुद्देभावात होणार घसरणसोयाबीन, कपाशीचे नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी, नाले वाहू लागले असून, काही तलाव भरले आहेत. याशिवाय शेतात पाणी साचले असून, सोयाबीन सोंगणीसह शेतातील विविध कामे ठप्प पडली आहेत. अवकाळी पावसापूर्वी काही दिवस कडक उन्हाने हजेरी लावल्यामुळे कपाशी पिकाला फायदा झाला होता. अनेक परिसरात पक्क्या झालेल्या कापसाच्या बोंडातून कापूस बाहेर पडला होता. दिवाळीपूर्वी कापसाची पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस शेतकर्‍यांच्या घरात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तीन दिवसांपासून येणार्‍या पावसामुळे कापूस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडाबाहेर पडलेल्या कापसावर पाणी पडल्यानंतर पांढरा दिसणारा कापूस काळवंडला असून, त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे  या पांढर्‍या सोन्याला मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सोयाबीन पिकापेक्षा जास्त २ लाख ५९ हजार ३४६ हेक्टर आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकर्‍यांचा कापूस पिकाकडे कल वाढला होता. यावर्षी सोयाबीनपेक्षा कापूस पीक चांगले येईल, असा अंदाज व्यक्त होत असताना अवकाळी पावसाने चांगलाच फटका दिला आहे.     दरवर्षीप्रमाणे यावर्षी कापूस पिकांची पहिली वेचणी होऊन कापूस घरात येईल, अशी अपेक्षा असताना सोयाबीन सोंगणीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकर्‍यांना फटका दिला आहे. शेतात काही शेतकर्‍यांची सोयाबीन सोंगणी सुरू असताना उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाला पावसाने फटका दिला आहे. येणार्‍या काही दिवसात पाऊस न थांबल्यास शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.    

सोयाबीन, कपाशी, मका पिकांना फटका धामणगाव बढे: गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन शेतात भिजत असून, शेकडो हेक्टरवरील कापूस व मक्याचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सुरुवातीला अल्पसा पाऊस पडला. त्यामुळे उत्पन्नामध्ये अगोदरच घट झाली. त्यानंतर परतीच्या पावसाने उद्ध्वस्त होत आहे. मागील चार दिवसांपासून धा.बढे, किन्होळा, सिंदखेड, पिंपळगावदेवी, पिंप्रीगवळी, पोफळी, ब्राम्हंदा, रोहिणखेड परिसरात दररोज मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात सोयाबीन, मका शेतात कापून ठेवले आहे. सततच्या पावसाने ही पिके सडत आहेत, तर त्यांना कोंब येत आहेत. सततच्या पावसामुळे कामे बंद आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. सुरुवातीचा अत्यल्प पाऊस, घटलेले उत्पन्न, मालाचे पडलेले भाव, वाढता खर्च व त्यात परतीच्या पावसाने होणारे नुकसान यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

धाड परिसरात पिके गेली वाहूनधाड : मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घालत, शेतकर्‍यांची पुरती दैना केली आहे. बुधवारी दुपारी जोरदार पावसानंतर आलेल्या  पुरामुळे परिसरातील शेतांमधील मक्याचे पीक व कृषी साहित्य वाहून गेले. गत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात नदीनाल्यांना पूर आले आहेत. जोरदार पावसाने बाणगंगा नदीस मोठा पूर आला. या पुराचे पाणी नदीलगत असणार्‍या धाड येथील शेतकरी गणेश बंडू गायकवाड यांच्या शेतात शिरले व संपूर्ण शेतातील पीक वाहून गेले.  गणेश गायकवाड यांनी  तीन एकरावर मका पिकाची लागवड केली होती. ती सोंगणी करून चारा व कणसे शेतात पडून होती. पुराच्या पाण्याचा वेग आणि व्याप्ती मोठीच असल्याने काही वेळातच तीन एकरावरील संपूर्ण मका पीक चार्‍यासह वाहून गेले. शेतात सोंगणी केलेला तब्बल एक लाखाच्या शेतमालाचे पुरामुळे नुकसान झाले., तसेच येथे त्यांचे स्प्रिंकलरचे १६ पाइप, एक मोटरपंप असे कृषी साहित्य पुराचे पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.