शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:43 IST

उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.

बुलडाणा: लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून बुलडाणा जिल्ह्यात जलसंपदा, समृद्धी महामार्गासह पुण्या, मुंबईतून स्वगृही जाण्यासाठी निघालेल्या व बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.दरम्यान, प्रसंगी, सहा मे रोजी श्रमीक एक्सप्रेसद्वारे त्यांना अलाहाबादपर्यंत सोडले जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ५४६ परराज्यातील मजूर अडकून पडले असून जिल्ह्यातील विविध कामामावर साडेचार हजारांच्या आसपास मजूर आहेत. यातील ज्या मजुरांनी स्वगृही जाण्यासाठीची इच्छा व्यक्त करून तशी आॅनलाईनची प्रक्रिया पुर्ण केली आहे, अशांपैकी पहिल्या टप्प्यात ५०७ मजुरांना उत्तरप्रदेशात पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून त्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाहीही सध्या पुर्णत्वास गेली आहे. संदर्भीय विषयान्वये जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचे नियोजन करण्यात आले असून काही नोडल अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वकाही सुरळीत पारपडल्यास सहा मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवरून श्रमीक एक्सप्रेसद्वारे या ५०७ मजुरांना स्वगृही पाठविण्यात येईल. त्याबाबतची अधिकृतस्तरावरील घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र प्रशासनाचे तसे नियोजन सुरू झाले आहे.

राजस्थानातील ४४ जणही परतणारराजस्थानमधील ४४  जणही त्यांच्या स्वत:च्या खासगी वाहनाने राजस्थानमध्ये पोहोचणार आहेत. त्यासंदर्भातील वैद्यकीय तथा महसूल प्रशासनस्तरावरील कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. या संबंधीत ४४ जणांचे स्वत:चे वाहन असल्याने तशी त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाUttar Pradeshउत्तर प्रदेशLabourकामगार