शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:54 IST

पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत.

योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रब्बीचा हंगाम अर्धा संपला तरी जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना अद्याप सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात पाऊस झाल्याने खरिपाची पीके हातातून गेली. जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. असे असतानाही सिंचन विभागातर्फे कोणतेही नियोजन यावर्षी करण्यात न आल्याने शेतकºयांना रब्बीसाठी पाणी मिळाले नसल्याची दुर्दैव आहे. राजकारणात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक उरले नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हयातील बहुतांश प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पाणीही आरक्षीत आहे. मात्र पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू न शकल्याने पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे.पाणी वापर संस्थांचे कुणी ऐकेना!शेतकºयांना सिंचनासाठी जास्तीत जास्त नियोजनबद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी वापर संस्था कार्यान्वीत करण्यात आल्या. मात्र पाणी वापर संस्थांचाही आवाज प्रशासनाकडून दाबण्यात आल्याचे दिसून येते. कुणी काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेतकºयांच्या रोषाचा सामना पाणी वापर संस्थांना करावा लागत आहे.१५ डिसेंबरच्या आश्वासनाचे काय झाले?मागणीनुसार १५ डिसेंबरपर्यंत सिंचन प्रकल्पातून कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र ५ जानेवारी आली तरी अद्याप पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकºयांची गरज लक्षात घेवून पाणीही आरक्षीत करण्यात आले. मात्र काही ठिकाणी शेतकºयांनी पाट फोडून ठेवले आहेत. त्यात कालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे थोडा उशिर झाला.- अनिल कन्ना अभियंता, जलसंपदा विभाग, बुलडाणा

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प