शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:54 IST

पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत.

योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रब्बीचा हंगाम अर्धा संपला तरी जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना अद्याप सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात पाऊस झाल्याने खरिपाची पीके हातातून गेली. जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. असे असतानाही सिंचन विभागातर्फे कोणतेही नियोजन यावर्षी करण्यात न आल्याने शेतकºयांना रब्बीसाठी पाणी मिळाले नसल्याची दुर्दैव आहे. राजकारणात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक उरले नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हयातील बहुतांश प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पाणीही आरक्षीत आहे. मात्र पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू न शकल्याने पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे.पाणी वापर संस्थांचे कुणी ऐकेना!शेतकºयांना सिंचनासाठी जास्तीत जास्त नियोजनबद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी वापर संस्था कार्यान्वीत करण्यात आल्या. मात्र पाणी वापर संस्थांचाही आवाज प्रशासनाकडून दाबण्यात आल्याचे दिसून येते. कुणी काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेतकºयांच्या रोषाचा सामना पाणी वापर संस्थांना करावा लागत आहे.१५ डिसेंबरच्या आश्वासनाचे काय झाले?मागणीनुसार १५ डिसेंबरपर्यंत सिंचन प्रकल्पातून कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र ५ जानेवारी आली तरी अद्याप पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकºयांची गरज लक्षात घेवून पाणीही आरक्षीत करण्यात आले. मात्र काही ठिकाणी शेतकºयांनी पाट फोडून ठेवले आहेत. त्यात कालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे थोडा उशिर झाला.- अनिल कन्ना अभियंता, जलसंपदा विभाग, बुलडाणा

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प