शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

लसीकरणासाठी भर उन्हात लागली रांग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

चिखली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता लसीकरणाचे महत्त्वदेखील नागरिकांना कळले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, ...

चिखली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता लसीकरणाचे महत्त्वदेखील नागरिकांना कळले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, लसीकरणाच्या ठिकाणी योग्य नियोजन नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात उभे राहावे लागत होते. ही बाब निदर्शनास येताच चिखली अर्बन बँकेने पुढाकार घेत लसीकरण केंद्रावर मंडप उभारल्याने या मायेच्या सावलीमुळे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यावर आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. सुरुवातील या लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद होता. मात्र, आता लसीचे महत्त्व कळल्याने, तसेच ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाली असल्याने लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. पर्यायाने लसींचा तुटवडादेखील जाणवत आहे. मात्र, सद्य:स्थितीत लसींचा साठा उपलब्ध असल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची लांबपर्यंत रांग लागत आहे. भर दुपारी कडक उन्हात नागरिकांना लसीसाठी नंबर लावावा लागत असल्याने उष्माघात होण्याचा धोका वाढला होता. ही बाब निदर्शनास येताच दि चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीष गुप्त यांनी तातडीने लसीकरण केंद्रावर मंडप टाकून सावलीची व्यवस्था केल्याने लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन सतीष गुप्त यांनी केले आहे.

लसीकरणाची व्याप्ती वाढविणे गरजेचे !

लसीकरणाच्या कामाला शहरात मोठा वेग आला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाबाबत पाळावयाच्या नियमांचा देखील फज्जा उडतो. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यासह मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहभाग आवश्यक !

यापूर्वी शहरातील काही प्रभागात स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देत वार्डातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता चिखली अर्बननेदेखील लसीकरणाच्या या मोहिमेत कृतिशील सहभाग नोंदवून नागरिकांची हेळसांड होऊ नये याची काळजी घेतली आहे. याच धर्तीवर इतर संस्था व लोकप्रतिनिधींचा पुढाकार घेतल्यास लसीकरणाची मोहीम यशस्वी होण्यास फारसा वेळ लागणार नाही.