शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

जिगाव प्रकल्पासाठी अवघी ७९० कोटी रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:25 IST

Jigaon Project पूर्ण करण्यासाठी जेथे दोन हजार कोटी रुपयांची गरज होती; तेथे अवघी ७९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दूर करण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पासाठी आगामी आर्थिक वर्षात नियोजनाप्रमाणे पूर्ण करण्यासाठी जेथे दोन हजार कोटी रुपयांची गरज होती; तेथे अवघी ७९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी, २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या मनसुब्यालाच त्यामुळे फटका बसला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे अवघे २५० कोटी रुपये या प्रकल्पाला मिळाले होते. त्यामुळे यंदा या प्रकल्पासाठी भरघोस निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यातच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे राज्याच्या अर्थसंकल्पाचा एक महिनापूर्वी सविस्तर आढावा घेतल्यामुळे अर्थसंकल्पात जिगावसाठी मोठी आर्थिक तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात ती अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पाचे काम रखडण्याची भीती असून, सर्वाधिक फटका हा भूसंपादनाच्या कामांना बसणार आहे. एकीकडे भूसंपादनाची प्रकरणे व्यपगत होऊ नयेत म्हणून मधल्या काळात भूसंपादन कायद्याच्या कलम २५ चा आधार घेत या प्रकरणांना मुदतवाढ घेण्यात येऊन शासनाच्या पैशाची बचत करण्याचे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेने केले. मात्र, आगामी आर्थिक वर्षात मिळणाऱ्या निधीतून नेमक्या कोणत्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, असा प्रश्न सध्या यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.प्रकल्पासाठी आगमी पाच वर्षांत सरासरी दोन हजार कोटी रुपये मिळाले, तरच हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्णत्वास जाऊ शकतो. मात्र, वर्तमान स्थिती पाहता आणखी २५ वर्षे हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल की नाही, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे.

अपेक्षांवर विरजणविदर्भातही बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा आहे. पश्चिम विदर्भाचा अनुशेष दूर करण्यात जिगाव प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. मात्र, या प्रकल्पाकडेच दुर्लक्ष होत आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुलडाण्यात जिगावसंदर्भात बैठक घेऊन भरघोस निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांनी व पालकमंत्र्यांनी जोर लावूनही एका वर्षासाठी आवश्यक असलेल्या १ हजार ९३० कोटी रुपयांचीही तरतूद अर्थसंकल्पात होऊ शकलेली नाही. त्यामुळे जलसंपदामंत्री, पालकमंत्री आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचेही हे मोठे अपयश आहे. राजकारण्यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षांवर त्यामुळे पाणी फेरल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प