शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाच ग्रामपंचायतींमध्ये ६० लाख रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:18 IST

यामध्ये प्रामुख्याने बावणबीर, आसलगाव, लोणी लव्हाळा, वडगाव गड, जामोद या गावांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि मेहकर तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामपंचायतींमध्ये दहा लाख रुपये खर्च मर्यादेत सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने विकास कामे घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ६० लाखांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.यामध्ये प्रामुख्याने बावणबीर, आसलगाव, लोणी लव्हाळा, वडगाव गड, जामोद या गावांचा समावेश आहे. दरम्यान २२ सप्टेंबर २०१५ च्या अल्पसंख्यांक विभागाच्या पत्रकानुसार ज्या ग्रामपंचायतींमध्ये किमान १०० लोकसंख्या ही अल्पसंख्यांकाची आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून अशा पद्धतीचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. त्यानुषंगाने उपरोक्त ग्रामपंचायतींमधून शादीखाना, काँक्रिट रस्ते कब्रस्तान संरक्षण भिंत अशी कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. आठ जुलै रोजीच जिल्हा परिषदेने यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समित्यांना पत्र देऊन अनुषंगीक प्रस्ताव मागविले होते.त्यानुषंगाने उपरोक्त पाच गावामध्ये अल्पसंख्यांकांची लोकसंख्या ही ७.२६ टक्के ते ३८.५७ टक्क्यांच्या आसपास असल्याने या गावातून हे प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या चार सदस्यीय समितीने उपरोक्त प्रस्ताव छाननी करून मंजूर केले असून ते राज्य शासनास पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आणखी काही ग्रामपंचायतींमध्ये अल्पसंख्यांकांची लोकसंख्या विचारात घेता असे प्रस्ताव येऊ शकतात. त्यादृष्टीने ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही जिल्हा परिषदेमधील सुत्रांनी स्पष्ट केले. यासाठी ग्रामपंचायतींचा ठराव, सरपंच, ग्रामसेवकांचे पत्र, खासदार आणि आमदारांचे शिफारस पत्र असणे अभिप्रेत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत