शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रगतिशील शेतकऱ्याने साधली दुग्ध व्यवसायातून प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST

सोयगाव येथील प्रगतिशील शेतकरी समाधान पाटील बुधवंत यांनी धाड येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती ...

सोयगाव येथील प्रगतिशील शेतकरी समाधान पाटील बुधवंत यांनी धाड येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे समाधान बुधवंत हे पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. तरी त्यांनी आपल्या शांत-संयमी वृत्तीमुळे व्यवसायात ठसा उमटवला. दुग्ध व्यवसायासाठी लागणारे पुरेसे भांडवल नव्हते, वडिलोपार्जित शेती व्यवसाय होता. त्यात फारसा नफा राहत नसल्यामुळे त्यात निसर्गाची कधी अतिवृष्टी, अवकृपामुळे शेती पूर्ण तोट्यात होती. शेतीला जोडधंदा द्यावा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला.

त्यांनी प्रथमच एक संकरित गाय घेतली. तिच्यापासून झालेल्या कालवडींचा सांभाळ केला व गायींची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. समाधान बुधवंत व त्यांच्या गोठ्यात आता जवळपास ५० ते ५१ संकरित गायी असून, त्यामध्ये २५ ते ३० गायी दूध देतात. वीस गायी गाभण आहेत. नियमित ओला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी वीस एकर शेतीपैकी सात एकर शेतीत कडवळ, मका, घास गवत तसेच अन्य चारापिके आलटून पालटून घेतली जातात. जनावरांसाठी कडबाकुट्टीचा वापर केला जातो. संतुलित आहार दिल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहत आहे. शिवाय गायींची शारीरिक क्षमता चांगली राहते. याच पद्धतीने १६ ते १८ महिने वयाच्या जवळपास २५ संकरित कालवडींचे संगोपन त्यांनी केले आहे.

जनावरांच्या आरोग्याची घेतली जाते काळजी

गोठ्यातील लहान-मोठे मिळून जवळपास ५० ते ५१ जनावरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी घेतली जाते. गायींना वर्षातून दोन वेळा लाळ्या, खुरकुत प्रतिबंधक लसीकरण फायलेरिया रिसर्चच्या वेळी लसीकरण घेतात. सध्या दूध देणाऱ्या २० ते २२ गायी आहेत. दररोज दोन वेळचे मिळून दोनशे लिटर दूध मिळते. दुधाला प्रति लिटर २५ ते ३० रुपये दर मिळतो. दुधाची अमर डेअरी धाड मुख्यालय बोदवड या डेअरीला विक्री होते. यापासून दररोज किमान सहा हजार रुपये उत्पन्न मिळते.

शेणखतातूनही मिळते उत्पन्न

लहान-मोठे मिळून ५१ जनावरांपासून दरवर्षी सुमारे ५० ते ६० ट्रॉली शेणखत मिळत असून, सध्या तीन ते चार हजार रुपये खताचा दर आहे. त्यातून हजारो रुपयांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी किमान १५ ते २० नवीन कालवडी विक्री होतात. किमान १८ महिने वयाच्या प्रति कालवडीपासून वीस ते पंचवीस हजार रुपये मिळतात. शेणखतापासून मिळालेले पैसे जनावरांच्या खाद्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे दूध व कालवडीपासून उत्पन्न फायद्यात राहते, असे समाधान बुधवंत यांनी सांगितले.