शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

मिरचीच्या पिकातून साधली शेतकऱ्यांनी प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

धामणगाव धाड : वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू केले ...

धामणगाव धाड : वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू केले आहे़ धामणगाव धाड परिसरात शेतकऱ्यांनी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून ही मिरची अकाेला, अकाेट आणि नागपूरपर्यंत विक्रीस जात आहे़ मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हाेत आहे़

धामणगाव परिसरात मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात मल्चिंग पेपरवर व मुबलक पाणीसाठ्यावर लागवड केलेली मिरची व पिके मोठ्या प्रमाणात बहरली आहे़ गेल्या वर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ अनेक शेतकऱ्यांनी मिरचीच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती़ त्यानंतर निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीचे लाखाे रुपयांचे उत्पादन घेतले हाेते़ सुरुवातीला हिरव्या मिरचीला ४० ते ६० रुपयांचा भाव मिळाला असताना अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला़ यावर्षी सुरुवातीपासूनच परिसरातील धामणगावसह वालसावंगी, पारध मासरूळ, डोमरूळ, टाकळी, तराडखेड आदी भागात लाखो हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे़ काेराेनाची स्थिती असतानाही मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचनाद्वारे मल्चिंग पेपरवर अंदाजे ७० ते ७५ टक्के मिरची लागवड झाली आहे. व्यापारी शेतातच मिरची विकत घेत आहे़ धामणगावची मिरची नागपूर, अमरावती, अकोट, अकोला, बुलडाणा, मुंबई वाशी, अहमदनगर, दिल्ली, भुसावळ येथील व्यापारी खरेदी करीत आहेत.

मिरची आठवडाभरावर तोडणीसाठी येणार असून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटात मिरची लिलाव सुरू करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून शेतकरी व मिरची उत्पादकांचे नुकसान होणार नाही़ लिलावामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल़

- शेषराव काळे, मिरची उत्पादक शेतकरी, धामणगाव धाड