शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 15:16 IST

२०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला २१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात गटशिक्षणाधिकारी स्तरावर आरटीई अंतर्गत येणाऱ्या जुन्या शाळा व नोंदणी झालेल्या नवीन शाळांची पडताळणी आजपासून करण्यात येत आहे. या पडताळणीसाठी व शाळांच्या नोंदणीसाठी ६ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.बालाकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनिमयानुसार खाजगी विनआनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला २१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. २०१९-२० या वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई २५ टक्के पात्र शाळांचे आपोआप नोंदणी करणे, तसेच या सर्व शाळांची गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पडताळणी करण्याची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू झाली आहे. त्यासाठी स्थलांतरीत शाळा, नव्याने अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा, अल्पसंख्यांक शाळा विचारात घेऊन ही कार्यवाही करण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये एकाचवेळी राबविण्यात येत आहे. पात्र खाजगी विना अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत पालकांना सुचीत करणे बंधनकारक आहे. सर्व प्रथम आरटीई प्रवेश पात्र शाहांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच २०२०-२१ करीता नोंदणीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण करता येणार आहे. अन्यथा आरटीई पोर्टलवर नोंदणी व पडताळणी करताना आरटीई २५ टक्के जागा अपडेट करता येणार नाही. २०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यावर्षी एकाच टप्प्यात प्रवेशाची लॉटरीयावर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी तीन टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. शाळेत रिक्त जागांएवढीच प्रतीक्षा यादी तयार करून अनुक्रमे प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी प्रसिद्ध करण्यात येवून याबाबत पालकाचे रजिस्टर क्रमांकावर सुद्धा संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या एकंदरीत प्रक्रियेकडे आतापासूनच पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत तीन ते चार टप्प्यात ही प्रक्रिया होत होती.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाbuldhanaबुलडाणा