शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

३० हजार व्यक्तींच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST

यासोबतच गृहनिर्माण क्षेत्रासह अन्य क्षेत्रांत बेभाव घेतल्या जाणाऱ्या रेतीचे दरही नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. परिणामी जवळपास २०० कोटींची ...

यासोबतच गृहनिर्माण क्षेत्रासह अन्य क्षेत्रांत बेभाव घेतल्या जाणाऱ्या रेतीचे दरही नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. परिणामी जवळपास २०० कोटींची उलाढाल असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील गृहनिर्माण क्षेत्राला उभारी मिळण्यास मदत होईल. १४ डिसेंबर रोजीच व्हीसीमध्ये पर्यावरण विभागाची जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. त्याअनुषंगाने प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येऊन आता प्रत्यक्ष लिलावाच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले होते. मधल्या काळात २०१९ मध्ये अंशत: लिलाव झाले होते. आता नव्या धोरणानुसार हे लिलाव होत आहेत. यामध्ये २०२०-२१ या वर्षाकरिता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच्या मुदतीसाठी पहिल्या टप्प्यातील ३१ व दुसऱ्या टप्प्यातील २९ अशा एकूण ६० रेती घाटांपैकी १२ रेती घाटांचा लिलाव करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बुलडाणा तालुक्यातील म्हसला बु, सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, तढेगाव, साठेगाव, जळगाव जामोद तालुक्यातील माणेगाव, दादुलगाव, हिंगणा बाळापूर, गोळेगाव बु. व खुर्द, झाडेगाव, भेंडवळ बुद्रुक व संग्रामपूरमधील पेसोडा या रेती घाटांचा लिलाव होणार आहे. या घाटांमधून सुमारे ३७ हजार ९५८ ब्रास रेती साठा उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्याची पूर्वनिर्धारित किंमत (अपसेट प्राईज) ४ कोटी ८४ लाख ३४ हजार ४०८ रुपये असून, यातून शासनाला जवळपास पाच कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल.

३० कोटींचा महसूल बुडाला होता

गेल्या दोन वर्षांपासून वाळू धोरणात झालेल्या बदलामुळे तथा कोरोना संसर्गामुळे रेती घाटांचे लिलाव रखडलेले होते. त्यामुळे दोन वर्षांत जवळपास २० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल बुडाला होता तर अवैध रेती उत्खनन व वाहतूकप्रकरणी तीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

गृहनिर्माण क्षेत्रात तेजीची शक्यता

मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील अर्थकारण रुळावर येत आहे. या निर्णयाचा आता गृहनिर्माण क्षेत्राला मोठा फायाद होणार असून, २०० कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. यासोबतच गुजरात, नंदुरबार भागातून येणारी व जादा भावाने खरेदी केल्या जाणाऱ्या रेतीलाही ब्रेक लागेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. एकट्या बुलडाणा शहरातील ७०० कामगारांना या निर्णयाचा फायदा होणार असून, जिल्ह्यातील या क्षेत्राशी निगडित कामगारांची संख्या ही जवळपास ३० हजार आहे.