शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने कांद्यासह भाज्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : आवक घटल्याने कांद्यासह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. लग्नसराईमुळे वांग्याला मागणी वाढली आहे. फळांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : आवक घटल्याने कांद्यासह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. लग्नसराईमुळे वांग्याला मागणी वाढली आहे. फळांचा सीझन संपत आल्याने दरवाढ झाली आहे. खाद्यतेलही चार ते पाच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे.

बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा ५० रुपये किलाेवर पाेहोचला आहे. हिरवी मिरची ६० रुपये किलाे तर वांगे ४० रुपयांवर पाेहोचले आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दर वाढले आहेत. फळबाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रा आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने जवळपास दुप्पटीने दर वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर वाढल्याचे चित्र आहे.

सफरचंद २४० रुपयांवर

गत आठवड्यापासून फळांची आवक घटली आहे. त्यामुळे, फळांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. इरानी सफरचंद २४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. तसेच डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहे. डाळिंबला गत आठवड्यात ६० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. कांदा, मिरची व इतर भाज्यांचे दर वाढले आहेत.

- संजय इंगळे, भाजी विक्रेता

सीझन संपल्याने गत आठवड्यापासून फळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे, सफरचंद, माेसंबी, डाळिंब, पपईचे दर वाढले आहेत. येत्या काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

- मुशीर बागवान, फळ विक्रेता

खाद्यतेल वधारले

दिवाळीपासून खाद्यतेलाचे दर माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार ते पाच रुपयांनी तेल महाग झाले आहे. फल्ली तेल १५९ रुपये तर साेयाबीन तेल १२९ रुपये प्रतिकिलाेवर दर गेले आहेत. मकरसंक्रांत जवळ आल्याने गूळ आणि तिळाचे दरही वाढले आहेत.